शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
3
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
4
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
5
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
6
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
7
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
8
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
9
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
10
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
11
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
12
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
13
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
14
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
15
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
16
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
17
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
18
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
19
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
20
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा गावचे कारभारीच थकवितात लाखोंचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:07 IST

कैलास पांढरे केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र ...

कैलास पांढरे

केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र केर्हाळा गावात अजबच प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून गावाचे कारभारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्यांनीच विविध प्रकारचा कर भरणा केला नाही. त्यामुळे कारभारीच असे वागले असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण असे म्हटले जाते. गावाचा कारभार चालविताना गावप्रमुखाचा आदर्श गावकरी घेत असतात. मात्र, जर कारभारीच चुकीचे वागू लागले तर त्याचा परिणाम गावाच्या व्यवस्थेवर पडतो. हे अगदी सत्य आहे. असाच काहीसा अजब कारभार हा सिल्लोड तालुक्यातील केर्हाळा गावात घडल्याचे समोर आले. केर्हाळा गावच्या सदस्यांनीच ग्रामपंचायतचा विविध प्रकारचा कर भरलाच नाही. तर काही सदस्यांनी अवेळी भरला तो ही अर्धवटच.

गेल्या पाच वर्षांपासून गावाचा कारभार चालविणारे आणि नव्याने होत असलेल्या निवडणुकीत गावचे कारभारीपद आपल्या हाती यावे म्हणून स्वप्न बाळगणारे उमेदवार, माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रकारचा कर भरणाच केला नाही. कारभाऱ्यांचीच अशी वृत्ती गावाच्या विकासाला अडसर ठरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तरी का म्हणून कर भरणा केला पाहिजे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केर्हाळा ग्रामपंचायत ही तेरा सदस्यांची आहे. २१ ते ३० डिसेंबर २०२० या नऊ दिवसांच्या कालखंडात विविध सेवा कराची २ लाख ३२ हजार चारशे तेवीस रुपये वसुली झाली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत दिवा, आरोग्य, पाणी, स्वच्छता या सारख्या विविध प्रकारच्या सेवेतून जमा होणारी रक्कम ही गावाच्या विविध विकासकामांसाठी वापरली जाते. जर कर वसुली वेळेवर योग्य पद्धतीने झाली नाही तर गावातील सर्वच कामकाजावर त्याचा परिणाम होतो. तर कर्मचाऱ्यांचा पगार ऱखडला जातो.

--------

ग्रामस्थांनाच का वेठीस धरता

सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही छोटे मोठे काम ग्रामपंचायतीकडे पडले की लगेच त्या लोकांची कर वसुली डायरी बाहेर काढली जाते. ज्याप्रमाणे गावातील सर्वसामान्य व्यक्तीकडून कर गोळा केला जातो. तशीच गावकारभाऱ्यांकडून सक्तीची वसुली का केली जात नाही. असा प्रश्न गावकरी विचारू लागले आहेत.

------

प्रशासनाने अपात्र ठरवावे

जर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचा सेवा कर एक वर्षापेक्षा अधिक काळ थकीत ठेवत असेल तर प्रशासनाने अशा ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवावे. ज्यामुळे गावाचा विकास होईल. आणि गावाला शिस्त देखील लागेल.

- सूर्यभान बन्सोड, केर्हाळा