शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

जेव्हा गावचे कारभारीच थकवितात लाखोंचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:07 IST

कैलास पांढरे केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र ...

कैलास पांढरे

केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र केर्हाळा गावात अजबच प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून गावाचे कारभारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्यांनीच विविध प्रकारचा कर भरणा केला नाही. त्यामुळे कारभारीच असे वागले असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण असे म्हटले जाते. गावाचा कारभार चालविताना गावप्रमुखाचा आदर्श गावकरी घेत असतात. मात्र, जर कारभारीच चुकीचे वागू लागले तर त्याचा परिणाम गावाच्या व्यवस्थेवर पडतो. हे अगदी सत्य आहे. असाच काहीसा अजब कारभार हा सिल्लोड तालुक्यातील केर्हाळा गावात घडल्याचे समोर आले. केर्हाळा गावच्या सदस्यांनीच ग्रामपंचायतचा विविध प्रकारचा कर भरलाच नाही. तर काही सदस्यांनी अवेळी भरला तो ही अर्धवटच.

गेल्या पाच वर्षांपासून गावाचा कारभार चालविणारे आणि नव्याने होत असलेल्या निवडणुकीत गावचे कारभारीपद आपल्या हाती यावे म्हणून स्वप्न बाळगणारे उमेदवार, माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रकारचा कर भरणाच केला नाही. कारभाऱ्यांचीच अशी वृत्ती गावाच्या विकासाला अडसर ठरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तरी का म्हणून कर भरणा केला पाहिजे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केर्हाळा ग्रामपंचायत ही तेरा सदस्यांची आहे. २१ ते ३० डिसेंबर २०२० या नऊ दिवसांच्या कालखंडात विविध सेवा कराची २ लाख ३२ हजार चारशे तेवीस रुपये वसुली झाली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत दिवा, आरोग्य, पाणी, स्वच्छता या सारख्या विविध प्रकारच्या सेवेतून जमा होणारी रक्कम ही गावाच्या विविध विकासकामांसाठी वापरली जाते. जर कर वसुली वेळेवर योग्य पद्धतीने झाली नाही तर गावातील सर्वच कामकाजावर त्याचा परिणाम होतो. तर कर्मचाऱ्यांचा पगार ऱखडला जातो.

--------

ग्रामस्थांनाच का वेठीस धरता

सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही छोटे मोठे काम ग्रामपंचायतीकडे पडले की लगेच त्या लोकांची कर वसुली डायरी बाहेर काढली जाते. ज्याप्रमाणे गावातील सर्वसामान्य व्यक्तीकडून कर गोळा केला जातो. तशीच गावकारभाऱ्यांकडून सक्तीची वसुली का केली जात नाही. असा प्रश्न गावकरी विचारू लागले आहेत.

------

प्रशासनाने अपात्र ठरवावे

जर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचा सेवा कर एक वर्षापेक्षा अधिक काळ थकीत ठेवत असेल तर प्रशासनाने अशा ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवावे. ज्यामुळे गावाचा विकास होईल. आणि गावाला शिस्त देखील लागेल.

- सूर्यभान बन्सोड, केर्हाळा