शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जेव्हा गावचे कारभारीच थकवितात लाखोंचा कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:07 IST

कैलास पांढरे केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र ...

कैलास पांढरे

केर्हाळा : गावाचा विकास हा गावप्रमुखाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो. त्याचे वागणे हे गावावर प्रभाव टाकत असते; मात्र केर्हाळा गावात अजबच प्रकार समोर आला आहे. गेल्या पाच वर्षांपासून गावाचे कारभारी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्यांनीच विविध प्रकारचा कर भरणा केला नाही. त्यामुळे कारभारीच असे वागले असतील तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लोकासांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण असे म्हटले जाते. गावाचा कारभार चालविताना गावप्रमुखाचा आदर्श गावकरी घेत असतात. मात्र, जर कारभारीच चुकीचे वागू लागले तर त्याचा परिणाम गावाच्या व्यवस्थेवर पडतो. हे अगदी सत्य आहे. असाच काहीसा अजब कारभार हा सिल्लोड तालुक्यातील केर्हाळा गावात घडल्याचे समोर आले. केर्हाळा गावच्या सदस्यांनीच ग्रामपंचायतचा विविध प्रकारचा कर भरलाच नाही. तर काही सदस्यांनी अवेळी भरला तो ही अर्धवटच.

गेल्या पाच वर्षांपासून गावाचा कारभार चालविणारे आणि नव्याने होत असलेल्या निवडणुकीत गावचे कारभारीपद आपल्या हाती यावे म्हणून स्वप्न बाळगणारे उमेदवार, माजी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रकारचा कर भरणाच केला नाही. कारभाऱ्यांचीच अशी वृत्ती गावाच्या विकासाला अडसर ठरली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी तरी का म्हणून कर भरणा केला पाहिजे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

केर्हाळा ग्रामपंचायत ही तेरा सदस्यांची आहे. २१ ते ३० डिसेंबर २०२० या नऊ दिवसांच्या कालखंडात विविध सेवा कराची २ लाख ३२ हजार चारशे तेवीस रुपये वसुली झाली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत दिवा, आरोग्य, पाणी, स्वच्छता या सारख्या विविध प्रकारच्या सेवेतून जमा होणारी रक्कम ही गावाच्या विविध विकासकामांसाठी वापरली जाते. जर कर वसुली वेळेवर योग्य पद्धतीने झाली नाही तर गावातील सर्वच कामकाजावर त्याचा परिणाम होतो. तर कर्मचाऱ्यांचा पगार ऱखडला जातो.

--------

ग्रामस्थांनाच का वेठीस धरता

सर्वसामान्य नागरिकांचे कोणतेही छोटे मोठे काम ग्रामपंचायतीकडे पडले की लगेच त्या लोकांची कर वसुली डायरी बाहेर काढली जाते. ज्याप्रमाणे गावातील सर्वसामान्य व्यक्तीकडून कर गोळा केला जातो. तशीच गावकारभाऱ्यांकडून सक्तीची वसुली का केली जात नाही. असा प्रश्न गावकरी विचारू लागले आहेत.

------

प्रशासनाने अपात्र ठरवावे

जर कुठलाही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायतीचा सेवा कर एक वर्षापेक्षा अधिक काळ थकीत ठेवत असेल तर प्रशासनाने अशा ग्रामपंचायत सदस्यास अपात्र ठरवावे. ज्यामुळे गावाचा विकास होईल. आणि गावाला शिस्त देखील लागेल.

- सूर्यभान बन्सोड, केर्हाळा