शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

ग्रीन यादीत नाव कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 00:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील किती शेतक-यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळाला, याची एकत्रित आकडेवारी जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्जदार शेतकºयांची माहिती प्रशासनाकडे नसल्याने या बँकांचे कर्जदार शेतकरी रोज बँकेत चकरा मारत आहेत, तर बँकांकडे पात्र शेतकºयांची कुठलीच माहिती नसल्याने कर्जमाफीच्या ग्रीन यादीत नाव येणार तरी कधी, असा प्रश्न शेतक-यांमधून उपस्थित केला जात आहे.राष्ट्रीयीकृत बँकांनी आपल्या कर्जदार शेतक-यांची माहिती मुख्य कार्यालयामार्फत आपले सरकार पोर्टलवर आॅनलाईन भरली आहे. शेतक-यांनी कर्जमाफीसाठी भरलेला अर्ज व बँकांनी भरलेली माहिती याचे संगणकीकृत वर्गीकरण करून पात्र शेतकºयांची ग्रीन यादी तयार होणार आहे. सदर यादी आॅनलाईन अपडेट झाल्यानंतर पात्र शेतक-यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, कर्जमाफीची यादी तयार करताना रोज नवीन बदल केले जात आहेत. त्यामुळे आतापर्यंत मोजक्याच शेतक-यांची नावे ग्रीन यादीत आली आहेत.जालना तालुक्यातील गोंदेगाव व वंजारउम्रद येथील एका तर मजरेवाडी येथील दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. अशाच प्रकारे बहुतांश गावांमध्ये तीन, चार दहा शेतक-यांची नावे पात्र यादीत दिसत आहेत. काही गावांमधील एकही शेतक-याचे नाव ग्रीन यादीत नाही. नेमकी कुठली कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पात्र यादीत नाव आले नाही, याबाबत विचारणा करण्याची सोय कुठेच नसल्याने चिंता वाढली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्जदार असलेल्या पात्र शेतकºयांची नावे थेट बँकेत येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांनी सांगितले. एकूणच कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी राबवणार, पात्र शेतक-याचे नाव यादीत कधी येणार याबाबत कुठलीही निश्चित माहिती नाही.