शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले?

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनपाच्या बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या या ‘कर वसुलीची’तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकण्याचा इशारा देत पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले, असा सवाल करून अप्रत्यक्षपणे मनपा आयुक्त बकोरिया यांना टोला लगावला. पोलीस प्रमुख मनपाचे काम पाहू लागले हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल. पोलिसांचा धाक दाखवून मालमत्ताकर वसूल करण्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत बसल्यास चुकीचा संदेश जाईल. मनपा आयुक्तांना हा निर्णय घेण्याची गरज काय आहे. ही लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीत ज्याप्रमाणे पूर्ण देशात कर वसुली होते. त्याचाच वापर झाला पाहिजे. याप्रकरणी मनपा आयुक्तांकडूनदेखील माहिती घेण्यात येईल, असे पालकमंत्री कदम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी थांबविण्याचे काम केले पाहिजे. वाळूज परिसरातील सागर नाडे या तरुणाच्या आत्महत्येला पोलीस आयुक्त जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा पूर्णत: कू्ररपणा असून, पोलीस आयुक्तांची ही दहशत खपवून घेतली जाणार नाही. भाजपची भूमिकाउपमहापौर प्रमोद राठोड यांनी मालमत्ताकरप्रकरणी काही तक्रारी असतील तर त्या नगरसेवकांमार्फत सोडविण्यात येतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी भाजप नगरसेवकांकडे कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, १० वर्षांपासून काही बड्या मालमत्ताधारकांकडे कर थकीत आहे. तो कर तर पालिकेला मिळालाच पाहिजे. सर्वसामान्यांचा कर वसुलीसाठी पालिका दारात उभी राहते. परंतु बडे थकबाकीदार अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत. त्यांच्याकडून कर मिळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. आयुक्तांनी पोलिसांकडे जाण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतले असते तर हा वाद उफाळला नसता, असे मत भाजपने व्यक्त केले.