शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले?

By admin | Updated: June 10, 2016 00:05 IST

औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे.

औरंगाबाद : मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मनपाच्या बड्या मालमत्ताकर थकबाकीदारांचा दरबार भरवून पोलिसी खाक्या दाखविल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पालकमंत्री रामदास कदम यांनी गुरुवारी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या या ‘कर वसुलीची’तक्रार मुख्यमंत्र्यांच्या कानावर टाकण्याचा इशारा देत पोलीस आयुक्त मनपाचे आयुक्त कधीपासून झाले, असा सवाल करून अप्रत्यक्षपणे मनपा आयुक्त बकोरिया यांना टोला लगावला. पोलीस प्रमुख मनपाचे काम पाहू लागले हे राज्यातील एकमेव उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल. पोलिसांचा धाक दाखवून मालमत्ताकर वसूल करण्यामुळे नागरिकांच्या मनात दहशत बसल्यास चुकीचा संदेश जाईल. मनपा आयुक्तांना हा निर्णय घेण्याची गरज काय आहे. ही लोकशाही आहे, लोकशाही पद्धतीत ज्याप्रमाणे पूर्ण देशात कर वसुली होते. त्याचाच वापर झाला पाहिजे. याप्रकरणी मनपा आयुक्तांकडूनदेखील माहिती घेण्यात येईल, असे पालकमंत्री कदम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. खा.चंद्रकांत खैरे म्हणाले, पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी थांबविण्याचे काम केले पाहिजे. वाळूज परिसरातील सागर नाडे या तरुणाच्या आत्महत्येला पोलीस आयुक्त जबाबदार असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हा पूर्णत: कू्ररपणा असून, पोलीस आयुक्तांची ही दहशत खपवून घेतली जाणार नाही. भाजपची भूमिकाउपमहापौर प्रमोद राठोड यांनी मालमत्ताकरप्रकरणी काही तक्रारी असतील तर त्या नगरसेवकांमार्फत सोडविण्यात येतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी भाजप नगरसेवकांकडे कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, १० वर्षांपासून काही बड्या मालमत्ताधारकांकडे कर थकीत आहे. तो कर तर पालिकेला मिळालाच पाहिजे. सर्वसामान्यांचा कर वसुलीसाठी पालिका दारात उभी राहते. परंतु बडे थकबाकीदार अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जुमानत नाहीत. त्यांच्याकडून कर मिळण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे. आयुक्तांनी पोलिसांकडे जाण्यापूर्वी सर्वांना विश्वासात घेतले असते तर हा वाद उफाळला नसता, असे मत भाजपने व्यक्त केले.