शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

हरवलेला अलीम नऊ वर्षांनंतर परततो तेव्हा...

By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST

जालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...तिथे मिळेल ते काम करु लागला...पण आईवडिलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देईना... अखेर रमजान ईदला त्याने नऊवर्षांपूर्वी त्याच्याजवळ असलेल्या मोबाईल क्रमाकांवरुन वडिलांशी संपर्क साधला आणि मुलाचा शोध घेऊन थकलेल्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रमजानमध्ये केलेल्या उपवासाचे फळ मिळाल्याची भावना जालन्यातील शेख अब्दुल कुटुंबायांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.जुन्या जालन्यातील देहेडकरवाडी परिसरातील शिशटेकडी भागात राहणारा अब्दुल अलीम अब्दुल खय्यूम शेख २९ डिसेंबर २००९ मध्ये वडील रागावले म्हणून घरातून निघून गेला. जालना रेल्वेस्थानकातून तो औरंगाबादला पोचला आणि तेथून एका रेल्वेत बसून थेट आग्रा येथे पोचला. अनेक दिवस इकडे तिकडे भटकंती केली. पोटासाठी मिळेल ते काम केले. त्यानंतर आग्रा येथील त्रिमूर्ती सिमेंट कंपनीत काम करू लागला आणि मित्रांसोबत तिथेच रमला. इकडे मुलाच्या शोध घेण्यासाठी शेख खय्यूम कुटुंबीयांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड, अजमेर, हैदराबाद, दिल्ली पालथी घातली. मात्र, मुलगा अलीम काही सापडला नाही. पोलिसांकडे चकरा मारून थकलेल्या शेख कुटुंबीयांनी मुलगा सापडेल, ही आशाच सोडली. दरम्यान, तिकडे अब्दुल अलीम सोबत सिमेंट कंपनीत काम करणारे हिंदू समाजाचे मित्र खास त्याच्यासाठी ईद साजरी करायचे. यंदाच्या ईदला त्यांनी अलीमला वडिलांना फोन करण्याचा आग्रह धरला. अलीमने शुक्रवारी वडिलांच्या जुन्या क्रमांकावर संपर्क केला. आवाज परिचयाचा वाटल्यानंतर अब्दुल खय्यूम यांनी अधिक चौकशी केली. मुलाने सर्व हकीकत सांगताच अब्दुल खय्यूम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी संपूर्ण पत्ता घेऊन नातेवाइकांसह आग्रा गाठले. सोमवारी सर्वजण अलीमला घेऊन जालन्यात पोहोचले.