शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमुळे मिळाला बुस्ट, आशिया पॉवर इंडेक्समध्ये भारताची लष्करी रँकिंग वाढली!
2
'बर्बाद अर्थव्यवस्थ' म्हणणारे कुठे गेले...? GDP ग्रोथच्या आकड्यांवरून भाजपचा राहुल गांधींवर निशाणा
3
तिकडे पाकिस्तान करतोय बॉम्बिंग, इकडे भारतानं अफगाणिस्तानला पाठवली मोठी मदद; तालिबान सरकार खुश
4
एकतर्फी प्रेमातून मुलाचं 'LIVE Suicide', आधी पेट्रोल ओतून पेटून घेतलं, मग रुग्णालयाच्या छतावरून मारली उडी
5
मनमोहनसिंग सरकारमधील कोळसामंत्री श्रीप्रकाश जायसवाल यांचे निधन, कानपूरमधून तीन वेळा झाले होते खासदार
6
SMAT 2025 : आयुष म्हात्रेचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
7
डीके शिवकुमार यांच्या आमदारांशी गाठीभेटी; उद्या सकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्यांसोबत ब्रेकफास्ट करणार...
8
IND vs SA ODI Series : टेस्टमध्ये नापास! इथं पाहा गंभीर 'गुरुजीं'चं वनडेतील 'प्रगतीपुस्तक'
9
एमएमसी झोनच्या ११ जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण, ८९ लाखांचं होतं बक्षीस; दरेकसा दलम झाला खिळखिळा
10
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
11
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
12
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
13
५ राजयोगात १४१ दिवसांनी शनि मार्गी: ९ राशींचे कल्याण, सुख-समृद्धीचे वरदान; सौभाग्य-यश-लाभ!
14
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
15
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
16
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
17
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
18
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
19
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
20
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
Daily Top 2Weekly Top 5

हरवलेला अलीम नऊ वर्षांनंतर परततो तेव्हा...

By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST

जालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...तिथे मिळेल ते काम करु लागला...पण आईवडिलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देईना... अखेर रमजान ईदला त्याने नऊवर्षांपूर्वी त्याच्याजवळ असलेल्या मोबाईल क्रमाकांवरुन वडिलांशी संपर्क साधला आणि मुलाचा शोध घेऊन थकलेल्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रमजानमध्ये केलेल्या उपवासाचे फळ मिळाल्याची भावना जालन्यातील शेख अब्दुल कुटुंबायांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.जुन्या जालन्यातील देहेडकरवाडी परिसरातील शिशटेकडी भागात राहणारा अब्दुल अलीम अब्दुल खय्यूम शेख २९ डिसेंबर २००९ मध्ये वडील रागावले म्हणून घरातून निघून गेला. जालना रेल्वेस्थानकातून तो औरंगाबादला पोचला आणि तेथून एका रेल्वेत बसून थेट आग्रा येथे पोचला. अनेक दिवस इकडे तिकडे भटकंती केली. पोटासाठी मिळेल ते काम केले. त्यानंतर आग्रा येथील त्रिमूर्ती सिमेंट कंपनीत काम करू लागला आणि मित्रांसोबत तिथेच रमला. इकडे मुलाच्या शोध घेण्यासाठी शेख खय्यूम कुटुंबीयांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड, अजमेर, हैदराबाद, दिल्ली पालथी घातली. मात्र, मुलगा अलीम काही सापडला नाही. पोलिसांकडे चकरा मारून थकलेल्या शेख कुटुंबीयांनी मुलगा सापडेल, ही आशाच सोडली. दरम्यान, तिकडे अब्दुल अलीम सोबत सिमेंट कंपनीत काम करणारे हिंदू समाजाचे मित्र खास त्याच्यासाठी ईद साजरी करायचे. यंदाच्या ईदला त्यांनी अलीमला वडिलांना फोन करण्याचा आग्रह धरला. अलीमने शुक्रवारी वडिलांच्या जुन्या क्रमांकावर संपर्क केला. आवाज परिचयाचा वाटल्यानंतर अब्दुल खय्यूम यांनी अधिक चौकशी केली. मुलाने सर्व हकीकत सांगताच अब्दुल खय्यूम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी संपूर्ण पत्ता घेऊन नातेवाइकांसह आग्रा गाठले. सोमवारी सर्वजण अलीमला घेऊन जालन्यात पोहोचले.