शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

हरवलेला अलीम नऊ वर्षांनंतर परततो तेव्हा...

By admin | Updated: July 3, 2017 23:52 IST

जालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...

बाबासाहेब म्हस्के । लोकमत न्यूज नेटवर्कजालना : वडिलांनी रागावले म्हणून रागाच्या भरात तो नऊ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला... रेल्वेने थेट आग्रा गाठले...तिथे मिळेल ते काम करु लागला...पण आईवडिलांची आठवण त्याला स्वस्थ बसू देईना... अखेर रमजान ईदला त्याने नऊवर्षांपूर्वी त्याच्याजवळ असलेल्या मोबाईल क्रमाकांवरुन वडिलांशी संपर्क साधला आणि मुलाचा शोध घेऊन थकलेल्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. रमजानमध्ये केलेल्या उपवासाचे फळ मिळाल्याची भावना जालन्यातील शेख अब्दुल कुटुंबायांनी सोमवारी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.जुन्या जालन्यातील देहेडकरवाडी परिसरातील शिशटेकडी भागात राहणारा अब्दुल अलीम अब्दुल खय्यूम शेख २९ डिसेंबर २००९ मध्ये वडील रागावले म्हणून घरातून निघून गेला. जालना रेल्वेस्थानकातून तो औरंगाबादला पोचला आणि तेथून एका रेल्वेत बसून थेट आग्रा येथे पोचला. अनेक दिवस इकडे तिकडे भटकंती केली. पोटासाठी मिळेल ते काम केले. त्यानंतर आग्रा येथील त्रिमूर्ती सिमेंट कंपनीत काम करू लागला आणि मित्रांसोबत तिथेच रमला. इकडे मुलाच्या शोध घेण्यासाठी शेख खय्यूम कुटुंबीयांनी औरंगाबाद, पुणे, मुंबई, नाशिक, मनमाड, अजमेर, हैदराबाद, दिल्ली पालथी घातली. मात्र, मुलगा अलीम काही सापडला नाही. पोलिसांकडे चकरा मारून थकलेल्या शेख कुटुंबीयांनी मुलगा सापडेल, ही आशाच सोडली. दरम्यान, तिकडे अब्दुल अलीम सोबत सिमेंट कंपनीत काम करणारे हिंदू समाजाचे मित्र खास त्याच्यासाठी ईद साजरी करायचे. यंदाच्या ईदला त्यांनी अलीमला वडिलांना फोन करण्याचा आग्रह धरला. अलीमने शुक्रवारी वडिलांच्या जुन्या क्रमांकावर संपर्क केला. आवाज परिचयाचा वाटल्यानंतर अब्दुल खय्यूम यांनी अधिक चौकशी केली. मुलाने सर्व हकीकत सांगताच अब्दुल खय्यूम यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. त्यांनी संपूर्ण पत्ता घेऊन नातेवाइकांसह आग्रा गाठले. सोमवारी सर्वजण अलीमला घेऊन जालन्यात पोहोचले.