शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
3
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
4
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
5
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
6
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
7
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
8
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
9
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
10
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
11
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
12
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
13
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
14
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
15
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
16
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
17
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
18
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
19
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
20
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती

प्रकरणाचे पुढे काय ? फायलीलाच फुटले पाय...

By admin | Updated: November 6, 2014 00:58 IST

दत्ता थोरे ,लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या पाच लाखाच्या इमारतीवर ७५ लाख खर्च करण्याच्या कारवाईला लाल फितीत दडपण्याच्या हालचाली सुरू आहेत.

भंडारा : पूर्व विदर्भातील धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्याला मागासलेपणाचा कलंक वेळोवेळी लावण्यात येतो. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हाच आपल्या पक्षाचा एजेंडा असून शेतकऱ्यांपासून तर सामान्यांपर्यंत विकासाच्या प्रवाहात आणणे हा आमचा मुख्य हेतू आहे. भंडारा जिल्ह्याचे नाव मागासलेपणाच्या कलंकापासून मुक्त करणे हा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी व्यक्त केले.राज्यात भाजपचे सरकार आरुढ झाल्यानंतर खासदार नाना पटोले यांची भंडारा येथील विश्रामगृहात प्रथमच पत्र परिषद झाली. यावेळी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे नवनिर्वाचित आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे, आ.चरण वाघमारे व आ.राजेश काशिवार उपस्थित होते.खा.पटोले म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विकासाच्या बाबतीत आमची जबाबदारी वाढली आहे. जिल्ह्यात बहुचर्चित व तेवढेच ज्वलंत प्रश्न आ वासून उभे आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र झटणारा बळीराजाची झोळी आजही खालीच आहे. धानाला समर्थन मुल्य मिळावे यासाठी स्वामीनाथन आयोगाची शिफारस स्वीकारण्याबाबत पक्षाची भूमिका सकारात्मक आहे. धान खरेदीचा मुद्दा हाच सर्वोच्च प्राधान्य मुद्दा आहे. त्यावर लवकरच सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता आहे. राज्यात तद्वतच जिल्ह्यातही भारनियमन होत आहे. खासगी क्षेत्रातून वीज खरेदी करून त्यावर निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्णत्वास नेऊन शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे, पुनर्वसनाच्या कामांना गती देणे यावर प्राधान्य आहे. जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. आजही लक्षावधी तरुणांच्या हातांना काम नाही. जिल्ह्यात उद्योगांना प्राधान्य देऊन राज्य शासनातर्फे एम.आय.डी.सी. क्षेत्रात उद्योग निर्मितीवर भर देण्याचा आमचा मानस आहे. त्यातच शेतीवर आधारित उद्योग स्थापित व्हावे अशी चाचपणी सुरु आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटणार नाही. त्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता सकारात्मक ठेवून विकासकार्याला प्राधान्य द्यावे असेही नाना पटोले यांनी सांगितले.तुमसर तालुक्यातील गर्रा बघेडा हे गाव खासदार योजनेअंतर्गत दत्तक घेण्यात आले आहे. तसेच सी.एस.आर. योजनेअंतर्गत तुमसर तालुक्यातील बारा गावांचा विकास केला जाणार आहे. त्या अंतर्गत शंभर कोटींचा खर्च केला जाणार आहे. या बारा गावात शिक्षण आरोग्य, रोजगार यावर विकासकार्य केली जाणार आहेत. मार्च २०१५ नंतर टप्प्याटप्प्याने या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील अन्य गावांचा समावेश केला जाणार आहे. नाग नदीच्या पाण्याचे शुद्धीकरणासंदर्भात कामही लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचेही खा.पटोले यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी, जि.प. सदस्य भरत खंडाईत, होमराज कापगते, सुर्यकांत इलमे, मुकेश थानथराटे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)