शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

झालर क्षेत्राचे आता काय होणार?

By admin | Updated: December 11, 2014 00:47 IST

औरंगाबाद : सिडकोने या योजनेतून अंग काढून घेतल्याने आता या गावांचा विकास करण्यासाठी कोणती संस्था जबाबदारी घेते, याकडे परिसरातील ग्रामस्थांबरोबरच बिल्डरांचेही लक्ष लागले आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद परिसरातील २८ गावांचा योजनाबद्ध विकास करण्यासाठी नेमण्यात आलेली प्राधिकृत संस्था सिडकोने या योजनेतून अंग काढून घेतल्याने आता या गावांचा विकास करण्यासाठी कोणती संस्था जबाबदारी घेते, याकडे परिसरातील ग्रामस्थांबरोबरच बिल्डरांचेही लक्ष लागले आहे. झालर क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने नियुक्त केलेल्या व स्पेशल प्लॅनिंग अ‍ॅथॉरिटी असलेल्या सिडकोने २८ गावांचा विकास आराखडाही तयार केला आहे. तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. २००६ साली सिडकोकडे झालर क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आठ वर्षांत दोन आराखडे सादर करण्यापलीकडे सिडकोला फार काही करता आले नाही. आता मात्र सिडकोने झालर क्षेत्रातून अंग काढून घेतल्याने आता विकासाचा हा मार्ग खडतर झाला आहे. सातारा आणि देवळाई या दोन गावांसाठी स्वतंत्र नगर परिषद झाल्याने तेथील नागरिकांचा प्रश्न सुटला आहे; मात्र आणखी २६ गावे यामध्ये अडकली आहेत. सिडकोने २८ गावांच्या विकासासाठी पाच झोन तयार करून त्याच्या विकासाचा आराखडा तयार केला होता. सातारा आणि देवळाईसाठी स्वतंत्र झोन होते. आता केवळ चार झोनअंतर्गत २६ गावे आहेत. यापैकी झोन ३ मध्ये येत असलेल्या पिसादेवी, गोपालपूर, साजापूर, कच्चेघाटी, हिरापूर आदी गावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या संख्येने जागा घेऊन ठेवल्या आहेत. त्याचबरोबर झोन ४ मधील सुंदरवाडी, झाल्टा, गांधेली आणि बाळापूर या बीड बायपास रस्त्यावरील गावांमध्ये सध्याच मोठ्या संख्येने बांधकाम व्यावसायिक घुसले आहेत. याठिकाणी नागरी वसाहती होण्याचे प्रमाण वाढत आहे. झोन २ मधील सावंगी परिसरातही मोठमोठे अपार्टमेंट उभे राहण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे भविष्यात नागरी सुविधांचा प्रश्न निर्माण होणार आहे. २८ गावांमध्ये एक व्यावसायिक संस्था म्हणून सिडकोने प्लॅन केला आहे. काही तक्रारी वगळल्या तरीही सिडकोने भविष्याचा वेध घेत सुविधांचे जाळे निर्माण करण्याचे नियोजन केले आहे. (समाप्त)