शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

लाॅकडाऊनने काय शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:04 IST

वकिलांना अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनविले -ॲड. सगर किल्लारीकर वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले, वेळेचीही बचत करायला ...

वकिलांना अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनविले -ॲड. सगर किल्लारीकर

वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले, वेळेचीही बचत करायला शिकलो...

बी. एल. सगर किल्लारीकर, उच्च न्यायालयातील वकील

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी बंद होती. त्याकाळात केवळ तातडीच्या प्रकरणावर ‘ऑनलाइन’ सुनावणी होत असल्यामुळे वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले.

न्यायालयात प्रकरण (याचिका) दाखल करणे, त्यात काही त्रुटी असल्यास त्याही दूर करणे, शपथपत्र इतर जोडपत्र आणि कॅव्हेट दाखल करणे, निबंधकाकडून सुनावणीच्या तारखा घेणे, याचिकेच्या सुनावणीस घरून अथवा आपल्या स्वतःच्या कार्यालयातूनच ‘ऑनलाइन’ हजर होणे, युक्तिवाद करणे आदी न्यायालयीन कामे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करावी लागली. यामुळे सर्व वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले.

मुंबई, औरंगाबाद, गोवा आणि नागपूर येथील अधिक अनुभवी आणि निष्णात वकिलांना तसेच राज्य शासनाच्या वतीने महाधिवक्ता आणि केंद्र शासनाच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल यांना इतर खंडपीठात ‘ऑनलाइन’ हजर होणे शक्य झाल्यामुळे त्याचप्रमाणे शासनाचे म्हणणे तात्काळ दाखल करता आल्यामुळे वेळेची बचत झाली. प्रकरणे तात्काळ निकाली निघाली. नांदेड येथील गुरुद्वारातर्फे दसऱ्याला निघणाऱ्या धार्मिक मिरवणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य शासनापुढे तिसऱ्या दिवशी औरंगाबाद खंडपीठात आणि सुटीच्या दिवशी, न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतरसुद्धा ‘ऑनलाइन’ सुनावणी होऊन प्रकरण निकाली निघाले.

इतर न्यायालयात चालू असलेल्या ज्वलंत प्रश्न आणि तातडीच्या प्रकरणावरील सुनावण्यांची नियमित माहिती घेणे शक्य झाले.

केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत असल्यामुळे दीर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणे निकाली निघू शकली नाहीत.

(शब्दांकन - प्रभुदास पाटोळे)