शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

लाॅकडाऊनने काय शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:04 IST

वकिलांना अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनविले -ॲड. सगर किल्लारीकर वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले, वेळेचीही बचत करायला ...

वकिलांना अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनविले -ॲड. सगर किल्लारीकर

वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले, वेळेचीही बचत करायला शिकलो...

बी. एल. सगर किल्लारीकर, उच्च न्यायालयातील वकील

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात न्यायालयात प्रत्यक्ष सुनावणी बंद होती. त्याकाळात केवळ तातडीच्या प्रकरणावर ‘ऑनलाइन’ सुनावणी होत असल्यामुळे वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले.

न्यायालयात प्रकरण (याचिका) दाखल करणे, त्यात काही त्रुटी असल्यास त्याही दूर करणे, शपथपत्र इतर जोडपत्र आणि कॅव्हेट दाखल करणे, निबंधकाकडून सुनावणीच्या तारखा घेणे, याचिकेच्या सुनावणीस घरून अथवा आपल्या स्वतःच्या कार्यालयातूनच ‘ऑनलाइन’ हजर होणे, युक्तिवाद करणे आदी न्यायालयीन कामे इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करावी लागली. यामुळे सर्व वकील अधिक ‘टेक्नोसॅवी’ बनले.

मुंबई, औरंगाबाद, गोवा आणि नागपूर येथील अधिक अनुभवी आणि निष्णात वकिलांना तसेच राज्य शासनाच्या वतीने महाधिवक्ता आणि केंद्र शासनाच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल यांना इतर खंडपीठात ‘ऑनलाइन’ हजर होणे शक्य झाल्यामुळे त्याचप्रमाणे शासनाचे म्हणणे तात्काळ दाखल करता आल्यामुळे वेळेची बचत झाली. प्रकरणे तात्काळ निकाली निघाली. नांदेड येथील गुरुद्वारातर्फे दसऱ्याला निघणाऱ्या धार्मिक मिरवणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दुसऱ्याच दिवशी राज्य शासनापुढे तिसऱ्या दिवशी औरंगाबाद खंडपीठात आणि सुटीच्या दिवशी, न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतरसुद्धा ‘ऑनलाइन’ सुनावणी होऊन प्रकरण निकाली निघाले.

इतर न्यायालयात चालू असलेल्या ज्वलंत प्रश्न आणि तातडीच्या प्रकरणावरील सुनावण्यांची नियमित माहिती घेणे शक्य झाले.

केवळ तातडीच्या प्रकरणावर सुनावणी होत असल्यामुळे दीर्घ काळापासून प्रलंबित प्रकरणे निकाली निघू शकली नाहीत.

(शब्दांकन - प्रभुदास पाटोळे)