शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

५० हजार कोटींच्या वॉटर ग्रीडचे भवितव्य काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:14 IST

मराठवाडा वॉटर ग्रीडचा गतवर्षी खूप गाजावाजा झाला होता. या योजनेने विशेषत: ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटणार असे चित्र रंगवण्यात आले होते. आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर श्रेयवादही रंगला होता; मात्र वर्षभर या योजनेबद्दल काहीच बोलले गेले नाही.

स.सो. खंडाळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाडा वॉटर ग्रीडचा गतवर्षी खूप गाजावाजा झाला होता. या योजनेने विशेषत: ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सुटणार असे चित्र रंगवण्यात आले होते. आॅक्टोबर २०१६ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा झाल्यानंतर श्रेयवादही रंगला होता; मात्र वर्षभर या योजनेबद्दल काहीच बोलले गेले नाही. आता नियोजित मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने या योजनेचे पुढे काय झाले, अशी चर्चा सुरू झाली आहे.मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी लागणाºया आरक्षणाला तत्त्वत: मान्यता देण्यात येत असल्याचे मे २०१७ ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते. धरणनिहाय पाणी मागणी व धरणाचा पाणीसाठा वितरित करण्यासाठी जलसंपदा विभागाशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार होता. जलसंपदा विभागाने धरणांमध्ये पाणी उपलब्ध आहे की नाही, याची खात्री करायची होती. कारण मराठवाडा ग्रीडसाठी लागणाºया पाण्याचे धरणनिहाय आरक्षण व सर्व धरणांतील सध्या असलेले पाणी आरक्षण, तसेच लागणारे पाणी आरक्षण याचा धरणनिहाय अभ्यास करून माहिती तयार करण्यात येणार होती. या सर्व कामांचे काय झाले, हा प्रश्न आहे.मराठवाड्यामध्ये वारंवार उद्भवणाºया टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील उपाययोजना न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांचा भर आहे. यासंदर्भात त्यांचाच पाठपुरावा आहे. मराठवाड्यासाठी ग्रीड पद्धतीच्या योजनेकरिता पाण्याची मागणी करताना त्या भागातील प्रस्तावित लोकसंख्या व कोणत्या धरणात किती पाणीसाठा उपलब्ध आहे, हे विचारात घेऊन धरणनिहाय कोणत्या धरणातून, कोणत्या तालुक्याला नागरी व ग्रामीण भागास पाणीपुरवठा करावा लागेल, यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करायला सांगण्यात आले होते.