शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
3
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
4
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
5
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
6
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
7
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
8
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
9
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
10
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
11
सेंट जॉर्जेसला लिव्हर ट्रान्सप्लांटचा परवाना; रुग्णालयातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

पासधारकांचे काय करायचे ?

By admin | Updated: August 27, 2014 00:15 IST

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे.

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे. परंतु विविध मार्गांवर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आणि अन्य कारणांचा विचार न करताच उद्दिष्टांपेक्षा कमी प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जात आहे. मग आम्ही पासधारकांना खाली उतरावयाचे काय, असा सवाल बसस्थानकातील वाहकांकडून केला जात आहे.अभियानात उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन चालक, वाहकांची नावे सूचना फलकावर प्रदर्शित करण्याची सूचना देण्यात आली. तर कमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना आहेत. परंतु प्रवासी वाढविण्यासाठी योग्य ते प्र्रबोधन करण्याऐवजी नाहक मनस्ताप दिला जात असल्याचे वाहकांनी सांगितले. एखाद्या दिवशी कमी प्रवासी वाहतूक झाल्यास दुसऱ्या दिवशी आगार व्यवस्थापकांना भेटल्याशिवाय तिकीट मशीन (ईटीआयएम) दिले जात नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत जर ड्यूटी असेल तर अधिकारी येईपर्यंत वाट बघावी लागते. यामध्ये अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे ड्यूटीचा वेळ अधिक होतो. त्याचा कोणताही विचार केला जात नाही. याचा महिला वाहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या मार्गावर प्रवासी वाहतूक कमी झाली, त्यामागील कोणत्याही कारणांचा विचार केला जात नाही. सुटीचा दिवस, एकाच मार्गावर एकाच वेळी अनेक गाड्या सोडणे, विविध पासधारकांचा विचार न करता कमी प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार धरले जात असल्याचे वाहकांनी सांगितले.