शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पासधारकांचे काय करायचे ?

By admin | Updated: August 27, 2014 00:15 IST

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे.

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे. परंतु विविध मार्गांवर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आणि अन्य कारणांचा विचार न करताच उद्दिष्टांपेक्षा कमी प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जात आहे. मग आम्ही पासधारकांना खाली उतरावयाचे काय, असा सवाल बसस्थानकातील वाहकांकडून केला जात आहे.अभियानात उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन चालक, वाहकांची नावे सूचना फलकावर प्रदर्शित करण्याची सूचना देण्यात आली. तर कमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना आहेत. परंतु प्रवासी वाढविण्यासाठी योग्य ते प्र्रबोधन करण्याऐवजी नाहक मनस्ताप दिला जात असल्याचे वाहकांनी सांगितले. एखाद्या दिवशी कमी प्रवासी वाहतूक झाल्यास दुसऱ्या दिवशी आगार व्यवस्थापकांना भेटल्याशिवाय तिकीट मशीन (ईटीआयएम) दिले जात नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत जर ड्यूटी असेल तर अधिकारी येईपर्यंत वाट बघावी लागते. यामध्ये अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे ड्यूटीचा वेळ अधिक होतो. त्याचा कोणताही विचार केला जात नाही. याचा महिला वाहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या मार्गावर प्रवासी वाहतूक कमी झाली, त्यामागील कोणत्याही कारणांचा विचार केला जात नाही. सुटीचा दिवस, एकाच मार्गावर एकाच वेळी अनेक गाड्या सोडणे, विविध पासधारकांचा विचार न करता कमी प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार धरले जात असल्याचे वाहकांनी सांगितले.