शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पासधारकांचे काय करायचे ?

By admin | Updated: August 27, 2014 00:15 IST

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे.

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे. परंतु विविध मार्गांवर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आणि अन्य कारणांचा विचार न करताच उद्दिष्टांपेक्षा कमी प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जात आहे. मग आम्ही पासधारकांना खाली उतरावयाचे काय, असा सवाल बसस्थानकातील वाहकांकडून केला जात आहे.अभियानात उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन चालक, वाहकांची नावे सूचना फलकावर प्रदर्शित करण्याची सूचना देण्यात आली. तर कमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना आहेत. परंतु प्रवासी वाढविण्यासाठी योग्य ते प्र्रबोधन करण्याऐवजी नाहक मनस्ताप दिला जात असल्याचे वाहकांनी सांगितले. एखाद्या दिवशी कमी प्रवासी वाहतूक झाल्यास दुसऱ्या दिवशी आगार व्यवस्थापकांना भेटल्याशिवाय तिकीट मशीन (ईटीआयएम) दिले जात नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत जर ड्यूटी असेल तर अधिकारी येईपर्यंत वाट बघावी लागते. यामध्ये अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे ड्यूटीचा वेळ अधिक होतो. त्याचा कोणताही विचार केला जात नाही. याचा महिला वाहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या मार्गावर प्रवासी वाहतूक कमी झाली, त्यामागील कोणत्याही कारणांचा विचार केला जात नाही. सुटीचा दिवस, एकाच मार्गावर एकाच वेळी अनेक गाड्या सोडणे, विविध पासधारकांचा विचार न करता कमी प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार धरले जात असल्याचे वाहकांनी सांगितले.