शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

पासधारकांचे काय करायचे ?

By admin | Updated: August 27, 2014 00:15 IST

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे.

औरंगाबाद : एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने आणि आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे १ आॅगस्टपासून ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ सुरू आहे. परंतु विविध मार्गांवर विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अन्य पासने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आणि अन्य कारणांचा विचार न करताच उद्दिष्टांपेक्षा कमी प्रवासी वाहतूक केल्याचा ठपका ठेवला जात आहे. मग आम्ही पासधारकांना खाली उतरावयाचे काय, असा सवाल बसस्थानकातील वाहकांकडून केला जात आहे.अभियानात उद्दिष्टापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या पहिल्या तीन चालक, वाहकांची नावे सूचना फलकावर प्रदर्शित करण्याची सूचना देण्यात आली. तर कमी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात यावे, अशा सूचना आहेत. परंतु प्रवासी वाढविण्यासाठी योग्य ते प्र्रबोधन करण्याऐवजी नाहक मनस्ताप दिला जात असल्याचे वाहकांनी सांगितले. एखाद्या दिवशी कमी प्रवासी वाहतूक झाल्यास दुसऱ्या दिवशी आगार व्यवस्थापकांना भेटल्याशिवाय तिकीट मशीन (ईटीआयएम) दिले जात नाही. त्यामुळे सकाळच्या वेळेत जर ड्यूटी असेल तर अधिकारी येईपर्यंत वाट बघावी लागते. यामध्ये अधिक वेळ वाया जातो. त्यामुळे ड्यूटीचा वेळ अधिक होतो. त्याचा कोणताही विचार केला जात नाही. याचा महिला वाहकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. ज्या मार्गावर प्रवासी वाहतूक कमी झाली, त्यामागील कोणत्याही कारणांचा विचार केला जात नाही. सुटीचा दिवस, एकाच मार्गावर एकाच वेळी अनेक गाड्या सोडणे, विविध पासधारकांचा विचार न करता कमी प्रवासी वाहतुकीसाठी जबाबदार धरले जात असल्याचे वाहकांनी सांगितले.