शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

तीन वर्षांत महिलांना काय मिळाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 01:30 IST

३१ आॅक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर आले. या तीन वर्षांकडे महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले असता मनोधैर्य योजनेत मिळालेला अधिकचा लाभ, माझी कन्या भाग्यश्री योजना आणि वन स्टॉप सेंटर यापेक्षा वेगळे महिलांना काहीही मिळालेले नाही, असे दिसून येते.

ऋचिका पालोदकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी महाराष्ट्रात भाजप सरकार सत्तेवर आले. या तीन वर्षांकडे महिलांच्या दृष्टिकोनातून पाहिले असता मनोधैर्य योजनेत मिळालेला अधिकचा लाभ, माझी कन्या भाग्यश्री योजना आणि वन स्टॉप सेंटर यापेक्षा वेगळे महिलांना काहीही मिळालेले नाही, असे दिसून येते.बलात्कार, बालकांवरील लैंगिक अत्याचार आणि अ‍ॅसिड हल्ल्यात बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसाह्य देण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना २०१३ साली सुरू करण्यात आली होती. या योजनेद्वारे मिळणाºया अर्थसहाय्याच्या रकमेत सुधारणा करून १ आॅगस्ट २०१७ पासून नवी योजना अमलात आली. जुन्या योजनेनुसार पीडितेला ३ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळायची ती नवीन योजनेत १० लाखांपर्यंत नेण्यात आलीआहे.या योजनेनुसार घटना घडल्यानंतर १५ दिवसांच्या आत पीडितेला एकुण रकमेच्या विशिष्ट टक्के रक्कम मिळणे अनिवार्य आहे. मात्र महिला व बालविकास विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे अत्याचार होऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला तरी पीडितेच्या खात्यामध्ये दमडीही जमा होत नाही, ही शोकांतिका आहे.मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेसंदर्भात पुरेशी जागृती न झाल्यामुळे अनेकांना ही योजना माहितीच नाही. जुन्या योजनेनुसार एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाºया जोडप्यांसाठी ही योजना होती. याअंतर्गत एक किंवा दोन मुलींनंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास मुलींच्या नावे खात्यामध्ये ठराविक रक्कम जमा होत होती. मात्र या योजनेला सर्वच ठिकाणांहून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने एक किंवा दोन मुली असणाºया आणि साडेसात लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाºया कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणा करण्यात आली.अंगणवाडी सेविकांकडून या योजनेचा प्रचार आणि प्रसार होणे अपेक्षित आहे. मात्र योजनेत सुधारणा करूनही अपेक्षित परिणाम दिसून येत नसल्यामुळे योजना अजून तरी अपयशी ठरल्याचे दिसत आहे.शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अ‍ॅसिड अ‍ॅटॅक किंवा सायबर गुन्ह्यातील पीडित, अशा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची तिची मानसिकता नसते.अशा महिलांना वन स्टॉप सेंटर या योजनेंतर्गत एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदतकेंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत, अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबरोबरच पीडितेच्या गरजेनुसार तात्पुरत्या निवा-याची सुविधादेखील या सेंटरमध्ये ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. शहरातील वन स्टॉप सेंटरचे काम अजूनही सुरूचआहे.