शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

‘गिरिजा’तील विहिरींना लागले मुबलक पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:12 IST

गिरिजा प्रकल्पातील चार विहिरींचे पाणी कमी झाल्याने खुलताबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने गिरिजा नदीत तातडीने तीन बुडकी विहिरी खोदल्या असून त्यांना मुबलक पाणी लागल्याने खुलताबादकरांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : गिरिजा प्रकल्पातील चार विहिरींचे पाणी कमी झाल्याने खुलताबाद शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेने गिरिजा नदीत तातडीने तीन बुडकी विहिरी खोदल्या असून त्यांना मुबलक पाणी लागल्याने खुलताबादकरांचा पाणीप्रश्न काही प्रमाणात मार्गी लागणार आहे.खुलताबाद शहराला तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात जेमतेम पाणी जमा झाले.परंतु सदरील प्रकल्प नोव्हेंबरमध्येच कोरडाठाक पडल्याने गिरिजा मध्यम प्रकल्पातील नगर परिषदेच्या चार विहिरींचे पाणी एकत्र करून चार दिवसाआड खुलताबादकरांना पाणीपुरवठा करण्यात येत होता.परंतु या विहिरींचे पाणी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तळाला गेल्याने शहरवासियांना गेल्या १५ दिवसांपासून ६ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली.नगर परिषदेने तातडीने गिरिजा मध्यम प्रकल्पात तीन बुडकी विहिरी (चर) खोदण्याचा निर्णय गेल्या आठवड्यात घेतला.या तिन्ही विहिरींना मुबलक पाणी लागल्याने जुन्या चार व नवीन बुडकी तीन विहिरींचे पाणी एकत्र करून खुलताबादकरांची तहान भागविली जाणार आहे. मार्च - एप्रिलमध्ये परत एकदा पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजना करावी लागणार आहे.खुलताबाद शहरात काही भागात मोठ्या प्रमाणावर पाणी असलेले हातपंप नादुरूस्त असून सदरील हातपंप दुरूस्त केल्यास पाणीप्रश्न मार्गी लागू शकतो. परंतु नगर परिषद हातपंप दुरूस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती लागत आहे.नगर परिषदेने तीन नवीन बुडकी विहिरी खोदल्या असून हे काम सुरूच असून त्यास मुबलक लागले आहे. तर एका जुन्या विहिरीचे दुरूस्तीचे कामही हाती घेतल्याने या सर्व दुरूस्तीस किमान पंधरा दिवस लागणार आहेत.