शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

स्मार्ट सिटी बस प्रवाशांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:03 IST

बससेवेच्या दुस‍ऱ्या वर्धापन दिनानिमित्त एएससीडीसीएल बस विभागाने औरंगपुरा, सिडको, महावीर चौक, रेल्वे स्टेशन आणि रांजणगाव येथे नागरिकांशी संवाद साधला. ...

बससेवेच्या दुस‍ऱ्या वर्धापन दिनानिमित्त एएससीडीसीएल बस विभागाने औरंगपुरा, सिडको, महावीर चौक, रेल्वे स्टेशन आणि रांजणगाव येथे नागरिकांशी संवाद साधला. याशिवाय स्मार्ट सिटी बस विभागातर्फे मुकुंदवाडी बस डेपो येथे शहर बसचे चालक, वाहक आणि मेकॅनिकसाठी कार्यशाळा घेण्यात आली. कॉर्पोरेट प्रशिक्षक नदीम पाशा यांनी कर्मचाऱ्यांना प्रवासी सुरक्षा व सहकार्याचे महत्त्व पटवून दिले. स्मार्ट सिटी बस विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत भुसारी, उपव्यवस्थापक ललित ओस्तवाल, विशाल खिल्लारे, सिध्दार्थ बनसोड, विलास काटकर, डी. आर. रावते, माणिक निला उपस्थित होते.

२४ हजार रुपये दंड वसूल

औरंगाबाद : महापालिकेने नेमलेल्या नागरी मित्र पथकाने शनिवारी २४ हजार २५० रुपये दंड वसूल केला. मास्क न वापरणे, रस्त्यावर कचरा, कॅरिबॅगचा वापर आदी कारणांसाठी दंड आकारण्यात येत आहे.

महापालिका मुख्यालयात रंगरंगोटीचे काम

औरंगाबाद : प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी महापालिका मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. यानिमित्ताने प्रशासनाने शनिवारपासूनच जोरदार तयारी सुरू केली असून, किरकोळ दुरुस्ती, रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येत आहे.

सिडको-हडकोतील पाणीपुरवठा पूर्ववत

औरंगाबाद : महावितरण कंपनीने शुक्रवारी सिडको हडको भागात दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्रांवर दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. शनिवारी विविध वसाहतींना पाणी देण्याचे काम सुरळीतपणे सुरू झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली.

टँकरच्या मागणीत हळूहळू वाढ

औरंगाबाद : शहरातील दोनशेपेक्षा अधिक वसाहतीमध्ये महापालिकेने जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत. अनेक वर्षांपासून या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. थंडी संपताच पाण्याच्या मागणीत हळूहळू वाढ होत आहे. महापालिकेला टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे.

कचरा दोन दिवस पडून राहतो

औरंगाबाद : कचरा संकलनासाठी महापालिकेने रेड्डी कंपनीची नियुक्ती केली आहे. कंपनीच्या रिक्षा काही वसाहतींमध्ये दोन ते तीन दिवस कचरा उचलण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कचरा बाहेर आणून टाकावा लागतो. अनेक ठिकाणी कंपनीकडून डोअर टू डोअर कलेक्शन होत नाही.

कटकट गेट येथील रस्त्याची अवस्था वाईट

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ऐतिहासिक कटकट गेटची डागडुजी करण्यात येत आहे. गेटच्या आजूबाजूला असलेल्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था आहे. दुचाकी चारचाकी वाहनधारकांना या ठिकाणी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय.

पावसाच्या पाण्याचा निचरा होणारच नाही

औरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. या निधी अंतर्गत सावरकर चौक ते सिल्लेखाना रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून सुरू असलेले काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. रस्ता एकीकडे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचे ठिकाण दुसरीकडे अशी परिस्थिती आहे.