शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बीडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचे उत्साहात स्वागत

By admin | Updated: July 20, 2014 00:03 IST

बीड: पंढरपूरहून शेगावकडे परतणाऱ्या गजानन महाराजांच्या पालखीचे शनिवारी सकाळी बीडमध्ये आगमन झाले.

कोल्हापूर : गांधीनगर येथील रि.स.नंबर २६३६ या सरकारी जागेबाबत कोल्हापूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाला पुणे विभागीय अप्पर आयुक्तशाम देशपांडे यांनी यापूर्वी दिलेली स्थगिती आज, शनिवारी कायम केली. आज सकाळी कोल्हापुरात ही सुनावणी झाली. याप्रकरणी आता ६ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.शहरालगत असलेल्या गांधीनगर येथील रि.स. नंबर २६३६ या ५७.१६ आर., पैकी सरकारी जमिनीवर ५१ व्यापारी व दुकानदार असलेल्या मिळकत धारकांनी अतिक्रमण केले होते. त्याबाबत काहीजणांनी तक्रारी केल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी सरकारी जमिनीवरील अतिक्रमण काढून ती सरकारी हक्कात घ्यावी, असे आदेश दिले होते. त्यानंतर २४ आॅगस्ट २०१२ रोजी या जमिनीवर उभारलेली ३६ दुकाने सील केली होती. या कारवाईच्या विरोधात तत्कालीन विभागीय आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे अपील करण्यात आले होते. तेथे त्यांनीही जमीन सरकारी हक्कात घेण्याचा आदेश कायम केला होता.विभागीय आयुक्तांच्या विरोधात महसूलमंत्री थोरात यांच्याकडे अपील केले गेले. त्यामुळे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडे हे प्रकरण पुनर्विचारार्थ पाठविण्यात आले. तेव्हा अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांनी आपल्या अधिकारात गांधीनगर येथील या जमिनीवरील बांधकाम ठरावीक रक्कम भरून घेऊन नियमित करून देण्यात यावीत, असा आदेश दिला होता. सुमारे एक एकर ३३ गुंठे ही जमीन केवळ ७५ हजार रुपये भरून घेण्याचे आदेश पवार यांनी दिले होते. त्याच्या विरोधात ४ जुलैला हिरालाल केशव गळीयल (रा. गांधीनगर) व कोल्हापुरातील प्रजासत्ताक संघटनेने विभागीय अप्पर आयुक्तांकडे अपील केले होते. यानुसार ७ जुलैला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. ती आजच्या सुनावणीवेळी कायम करण्यात आली. साथीच्या आजार रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरजसीपीआर ,महापालिका,जिल्हा परिषद प्रशासनावर जबाबदारीकोल्हापूर : डेंग्यू , काविळ, मलेरिया या साथीच्या आजाराचे रुग्ण दगावल्यानंतरच जिल्हा प्रशासन जागे होते, हे आजपर्यंतचे चित्र आहे. काल (शुक्रवारी) हेर्ले (ता.हातकणंगले) येथील बालिकेचा डेंग्युसदृश्य आजाराने मृत्यु झाला. विशेषत : पावसाळ्यात या साथीचे आजार डोके वर काढतात. या आजारांना पायबंद घालण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. त्यासाठी कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) प्रशासनाने महत्वाची जबाबदारी उचलावी.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण रुग्णालयात अशा आजारांचा रुग्ण आला तर त्यावर तत्काळ उपचार करावे अशा सक्त सुचना वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिला असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.प्राथमिक आरोग्य केंद्रांना सूचनासीपीआर प्रशासनाच्या अखत्यारित चार कोडोली, गडहिंग्लज, सेवा रुग्णालय (लाईन बाजार) व जयसिंगपूर ही उपजिल्हा रुग्णालये तर १६ प्राथमिक आरोग्य केंद्रे असे एकूण २० रुग्णालये येतात. प्राथमिक आरोग्य केंद्रातील मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांना साथीच्या आजाराचे रोज किती रुग्ण दाखल झाले, याची माहिती द्यावी, अशा सक्त सुचना जिल्हाशल्यचिकित्सकांनी यांनी दिल्या आहेत.साथीच्या आजाराने डोकेवर काढल्याने महापालिका प्रशासन सतर्क राहिले आहे.शहरातील कोणत्याही खासगी रुग्णालयात डेंग्यु,मलेरिया व काविळ या आजाराची लागण झाल्यास तत्काळ कळवावे.नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी औषध फवारणी,गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.