शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

हवामानाचा वेध घेणारे अत्याधुनिक यंत्र कार्यान्वित

By admin | Updated: July 10, 2016 01:00 IST

औरंगाबाद : औरंगाबाद आणि १० किलोमीटर परिसरातील हवामान व त्यामध्ये होणारे बदल अचूक टिपणारे स्वयंचलित हवामान यंत्र शनिवारी कार्यान्वित झाले.

औरंगाबाद : औरंगाबाद आणि १० किलोमीटर परिसरातील हवामान व त्यामध्ये होणारे बदल अचूक टिपणारे स्वयंचलित हवामान यंत्र शनिवारी कार्यान्वित झाले. महात्मा गांधी मिशनच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या या यंत्राचे लोकार्पण शनिवारी प्रसिद्ध शास्रज्ञ डॉ. निवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे शेतकरी संशोधक विद्यार्थी, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना याचा लाभ होणार आहे. या केंद्रामुळे सहा तास आधी औरंगाबादमधील हवामानाचा अंदाज वेबसाईटवर कळेल. शिवाय हवामानविषयक १५ मानकांची येथे माहिती मिळू शकेल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहितीची देवाण -घेवाण या केंद्राद्वारे करता येईल. हवामानाच्या बदलाची माहिती घेण्यासाठी आतापर्यंत चिकलठाणा वेधशाळेवर अवलंबून राहावे लागत होते; परंतु आता औरंगाबादसाठी स्वतंत्र असे हवामान केंद्र्र महात्मा गांधी मिशन यांच्या वतीने उपलब्ध झाले आहे. या यंत्राच्या लोकार्पणानंतर मार्गदर्शन करताना डॉ. निवास पाटील यांनी खगोलशास्त्राचा हवामानाशी संबंध किती महत्त्वाचा आहे, याचे स्पष्टीकरण गणिती समीकरणाद्वारे उलगडून सांगितले.एकंदरीत विश्वाचा प्रवास कशा प्रकारे झाला आहे, हे आजच्या विज्ञानाशी सांगड घालून त्यांनी माहिती दिली. सूर्यमालेचे वर्णन, त्यामध्ये होणारे बदल व बदलांच्या परिणामाचा आढावा यावेळेस त्यांनी घेतला. काम करा आणि निरोगी राहा हा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला. हवेची दिशा, पावसाचे प्रमाण, पुढील बारा तासांचा हवामान अंदाज अतिनील किरणे दवबिंदू इ. घटकांची माहिती पूर्णत: सौरऊर्जेवर चालणाऱ्या या हवामान यंत्राची माहिती खगोलशास्र व अंतराळ तंत्रज्ञान नांदेड केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.महात्मा गांधी मिशनचे सचिव अंकुशराव कदम, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव बोराडे, प्राचार्य सुधीर देशमुख,आशिष गाडेकर, स्थापत्य विभागप्रमुख डॉ. संगीता शिंदे तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.