शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘गणेश मेळ्यांतून आम्ही स्वातंत्र्याची गाणी म्हणत असू’: ताराबाई लड्डा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:06 IST

(स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू ) औरंगाबाद: औरंगपुऱ्याच्या पलीकडे त्यावेळी औरंगाबाद नव्हतं. इकडे पैठणगेटच्या पुढे सारी झाडं होती. शिक्षणात ...

(स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू )

औरंगाबाद: औरंगपुऱ्याच्या पलीकडे त्यावेळी औरंगाबाद नव्हतं. इकडे पैठणगेटच्या पुढे सारी झाडं होती. शिक्षणात मुलींचं प्रमाण नगण्य. आमच्या बाजूला माणिकचंद पहाडे राहत होते. आशाताई वाघमारेही याच परिसरात म्हणजे शाहगंज परिसरात राहत होत्या. एक वातावरण मिळत गेलं. तसं आम्ही लहान असल्यामुळे काही कळत नव्हतं. माणिकचंद पहाडे, आशाताई वाघमारे जसं सांगत होते, तसं करीत होतो. गणेशोत्सवात बाळगोपाळ, बलभीम, रघुवीर या मेळ्यांची धूम असायची. आम्ही सिनेमातील गाण्यांच्या चालीवर काव्यरचना करून स्वातंत्र्याची गाणी गात होतो......

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी ताराबाई लड्डा जसं जसं आठवत होतं, तसं सांगत होत्या. ताराबाईंचा जन्म १९२९चा. त्यांचे पती बन्सीलाल लड्डाही स्वातंत्र्याच्या लढ्यात अग्रभागी राहिलेले. ताराबाईंनी राज्य व केंद्र सरकारची पेन्शन घेतलेली नाही. त्या नोकरीत होत्या. १९८८ साली निवृत्त झाल्या. ती पेन्शन मात्र त्यांना मिळते.

मराठवाड्यावर निजामी राजवट असल्यामुळे मुख्यत: हा लढा निजामाच्या विरोधातला होता. ताराबाई सांगत होत्या, त्यावेळी वर्तमानपत्रे नव्हती. हैदराबादहून ‘निजाम विजय’येत होता. पुण्या-मुंबईकडची वर्तमानपत्रे चोरून-मारून आणावी लागत होती. गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, संग्रामसिंह चौहान, द्वारकादास पटेल, नाना जेधे, भीमराव कुळकर्णी, लालचंद मालानी, रतिलाल जरीवाला, चंदाबेन जरीवाल आदींचा नामोल्लेख करीत ताराबाईंनी लढ्यातले अनेक प्रसंग उभे केले.

मुख्यत: भूमिगत राहून त्यांनी काम केले. त्यावेळी साधे फोनही लवकर उपलब्ध नव्हते. खबर द्यावी लागायची. मग ती चिठ्ठी कशी पोहोचवावी लागत असे, हे त्यांनी सांगितले. येवल्याच्या कॅम्पमध्ये पती बन्सीलाल लड्डा यांना कानाखाली गोळी लागली होती, याची आठवण त्यांनी केली.

..............................................

कॉम्रेड मनोहर टाकसाळ म्हणतात;

स्वातंत्र्याचा जयजयकार करतो पण.......

१५ ऑगस्टपासून स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरु होत आहे. मी स्वातंत्र्याचा जयजयकार करतो. स्वातंत्र्यासाठी लढलेल्या तमाम शहिदांना, सैनिकांना मानाचा मुजरा करतो, असे सांगत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कॉम्रेड मनोहर टाकसाळ यांनी ज्या उद्देशांसाठी स्वातंत्र्यप्राप्ती झाली, ते उद्देश सफल होताना दिसत नसल्याचे दु:ख व्यक्त केले.

कॉ. मनोहर टाकसाळ हे बीड जिल्ह्याचे. ते त्यावेळी लहान होते. त्यांचे मूळ गाव राजुरीत पिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याच्या या लढ्यात ओढले गेले. आणि कार्य करू लागले. तेथेच त्यांच्यावर साम्यवादाचे संस्कार झाले. तेव्हापासून त्यांनी हाती धरलेला लालबावटा सोडला नाही.

कॉ. टाकसाळ यांना राज्य आणि केंद्र सरकारची पेन्शन मिळते, ते म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांचे स्वप्न तसेच राहिले. गांधी-नेहरू लढले. भगतसिंग फासावर गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले. पण संविधानातील मूल्ये उद्ध्वस्त होताना दिसत आहेत. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय संपुष्टात येत आहे. इथे लोकशाहीची रोज हत्या होत आहे.