शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हमारे पास रेमडेसिविर है, आपके पास क्या है...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:04 IST

औरंगाबाद : ज्या रुग्णालयाकडे पुरेसे रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत, सध्या ती रुग्णालये श्रीमंत मानली जात आहेत. त्यादृष्टीने सध्या जिल्हा ...

औरंगाबाद : ज्या रुग्णालयाकडे पुरेसे रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध आहेत, सध्या ती रुग्णालये श्रीमंत मानली जात आहेत. त्यादृष्टीने सध्या जिल्हा सामान्य रुग्णालय या इंजेक्शनच्या बाबतीत श्रीमंतच म्हणावे लागेल. तर गोरगरीब रुग्णांचा आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयाची इंजेक्शनची जुळवाजुळव करताना त्रेधा उडते आहे. एप्रिल महिन्यात खासगी रुग्णालयांना उसणे इंजेक्शन देणाऱ्या घाटी रुग्णालयावर आता जिल्हा रुग्णालयाकडून रेमडेसिविर घेण्याची वेळ आली आहे.

राज्यभरात एप्रिल महिन्यात इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. अनेक शहरात इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना भटकंती करावी लागली. त्यावेळी घाटी रुग्णालयात मात्र महिनाभर पुरेल इतका साठा होता. इंजेक्शन लागत असेल तर रुग्णाला ५ दिवस घाटी रुग्णालयात दाखल करा, असेही घाटी प्रशासनाने जाहीर केले होते. मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण घाटीत दाखल होत आहे. यात अनेकांना रेमडेसिविरची गरज असते. घाटीत दाखल झाल्याने इंजेक्शनची सहज उपलब्धता होत गेली. इंजेक्शन पुरेसे उपलब्ध असल्याने घाटी प्रशासनाने काही खासगी रुग्णालयांना उसनवारीवर इंजेक्शनही पुरविले; परंतु आता घाटीलाही इंजेक्शनच्या तुटवड्याला सामोरे जावे लागते आहे. रोज २५० ते ३०० इंजेक्शन याठिकाणी लागतात. इंजेक्शन कमी पडत असल्याने शुक्रवारी घाटी प्रशासनाने जिल्हा रुग्णालयाकडे ८०० इंजेक्शनची मागणी केली; पण जिल्हा रुग्णालयाकडून घाटीला २५० इंजेक्शन देण्यात आले. घाटी प्रशासनाकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळे येथील रुग्णांची इंजेक्शनसाठी कोणतीही गैरसोय होत नाही.

पुरेसा साठा

घाटी रुग्णालयाने ८०० रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होती. त्यांना २५० इंजेक्शन देण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात सध्या या इंजेक्शनचा पुरेशा प्रमाणात साठा आहे.

- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक