शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद महिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे

सुनील कच्छवे, औरंगाबादमहिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याने गतवर्षी भीषण दुष्काळ अनुभवला. जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू केले होते. मेअखेरीस टँकरची संख्या तीनशेच्या पुढे गेली. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे टँकरची संख्या आणखीनच वाढली. जुलै महिन्यातही जिल्ह्यात सुमारे अडीचशे गावांना ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आॅगस्ट महिन्यात मात्र बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे आॅगस्टअखेरीस जिल्ह्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले; परंतु त्यानंतरही पावसाची अवकृपा कायम राहिली. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांकडून ठिकठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैठण तहसील कार्यालयाकडून टँकरचे काही प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या मंडळांमध्ये टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाच गावांमध्ये पाच टँकर सुरू करावेत, अशी मागणी या प्रस्तावांतून करण्यात आली आहे.