शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

पावसाळा संपताच जिल्हा टँकरच्या वाटेवर

By admin | Updated: October 10, 2014 00:42 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद महिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे

सुनील कच्छवे, औरंगाबादमहिनाभरापूर्वीच टँकरमुक्त झालेल्या जिल्ह्याची वाटचाल पुन्हा एकदा टँकरच्या दिशेने सुरू झाली आहे. पावसाळा संपताच जिल्ह्यात ठिकठिकाणी पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातून टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्याने गतवर्षी भीषण दुष्काळ अनुभवला. जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या गावांची तहान भागविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू केले होते. मेअखेरीस टँकरची संख्या तीनशेच्या पुढे गेली. जून महिन्यात पाऊस पडल्यानंतर टँकर बंद होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, संपूर्ण जून महिना कोरडा गेला. त्यामुळे टँकरची संख्या आणखीनच वाढली. जुलै महिन्यातही जिल्ह्यात सुमारे अडीचशे गावांना ३३३ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. आॅगस्ट महिन्यात मात्र बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे आॅगस्टअखेरीस जिल्ह्यातील टँकर पूर्णपणे बंद झाले; परंतु त्यानंतरही पावसाची अवकृपा कायम राहिली. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतर पुन्हा एकदा पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे तहसील कार्यालयांकडून ठिकठिकाणी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पैठण तहसील कार्यालयाकडून टँकरचे काही प्रस्ताव नुकतेच प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील कमी पाऊस झालेल्या मंडळांमध्ये टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाच गावांमध्ये पाच टँकर सुरू करावेत, अशी मागणी या प्रस्तावांतून करण्यात आली आहे.