शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

अखेर रविवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण

By | Updated: December 2, 2020 04:07 IST

औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी रेल्वेस्टेशन रोडवर एचएससी बोर्डसमोर फुटली होती. तब्बल ...

औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी गुरुवारी सकाळी रेल्वेस्टेशन रोडवर एचएससी बोर्डसमोर फुटली होती. तब्बल चार दिवस रात्रंदिवस सुरु असलेले महापालिकेचे जलवाहिनी जोडण्याचे काम रविवारी पहाटे पाच वाजता पूर्ण झाले. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली.

रेल्वे स्टेशन रोडवर जलवाहिनी सिमेंट रस्त्याच्या खालून घेतलेली आहे. अधूनमधून ही जलवाहिनी फुटत असल्यामुळे महापालिकेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी जलवाहिनी फुटली. जलवाहिनीचा एक मोठा तुकडा बदलावा लागणार होता. एवढा मोठा तुकडा महापालिकेकडे आणि शहरात कुठेच उपलब्ध नव्हता. धुळे येथे खास टीम पाठवून जलवाहिनीसाठी लागणारा लोखंडी तुकडा मागविण्यात आला. सिमेंट जलवाहिनीला लोखंडी तुकडा बसविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले. त्यांच्या मदतीने शुक्रवारी सायंकाळी काम सुरू झाले. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर रविवारी पहाटे पाच वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यामुळे महापालिका पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. चार दिवसांपासून जलवाहिनी बंद होती. त्यामुळे शहरात पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर अगोदर टेस्टिंग करण्यात आली. त्यानंतर सकाळी साडेसात वाजता शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. चार दिवसांपासून ज्या वसाहतींना पाणी देता आले नव्हते त्या वसाहतींना पाणी देण्याचे काम सुरू करण्यात आले. १४०० मि.मी. व्यासाची दुसरी स्वतंत्र जलवाहिनी सुरू होती. त्या जलवाहिनीचा आधार घेत जुन्या शहरातील काही पाण्याच्या टाक्यांवर पाणी पोहोचविण्यात येत होते. त्यामुळे शहरात पाण्याची प्रचंड ओरड झाली नाही.