शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पाणीपरवानगीचा सावळागोंधळ

By admin | Updated: March 5, 2017 04:13 IST

उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत दौंड, भीमानगर, इंदापूर पाणी व्यवस्थापन विभागाच्या दोन्ही कार्यालयांतून समन्वय नसल्यामुळे उजनी धरण पाणी

देऊळगावराजे : उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत दौंड, भीमानगर, इंदापूर पाणी व्यवस्थापन विभागाच्या दोन्ही कार्यालयांतून समन्वय नसल्यामुळे उजनी धरण पाणी व्यवस्थापन विभागाच्या सावळा गोंधळासमोर आला आहे. मात्र याचा प्रत्यक्ष परिणाम दौंड तालुक्यातील उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेला शेतकऱ्यांना बसत आहे. वास्तविक पाहता उजनीच्या मुख्य शाखा असलेला भीमानगर इंदापूर येथून उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत स्पष्ट सांगण्यात येत आहे, की उजनी धरणातील शेतकऱ्यांना उजनीच्या पाण्याबाबत तात्पुरत्या स्वरूपात परवाने बंद करण्यात आले आहेत. दौंडच्या कार्यालयात पाणी परवानगीच्या स्थगितीबाबत इंदापूरचे भीमानगर उजनी पाणी व्यवस्थापन शाखेतून लेखी स्वरूपात काहीही आले नाही. परिणामी दौंडच्या शाखेतून पाणी परवानगीबाबत दौंडच्या शेतकऱ्यांचे रीतसर २७ पाणी परवानगीप्रकरणे भीमानगर येथील कार्यालयात पाठविण्यात आली आहेत. आता या शेतकऱ्यांपुढे या दोन्ही कार्यालयांतून मिळणाऱ्या वेगवेगळ्या उत्तरांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. (वार्ताहर)शेतकरी चिंताक्रांतदौंडच्या पूर्व भागातील आलेगाव ते खानोटा भागातील शेतकरी पाणी परवानगी मिळविण्यासाठी शेतकऱ्याला होणारा खर्च भरण्यासाठी तयार आहेत. पाणी परवानगीबाबत तात्पुरती स्थगिती उठेल की कायम राहील याबाबत निर्णय होत नाही. आता जर शेतकऱ्यांनी पाणी परवानगीसाठी खर्च केला आणि तात्पुरती स्थगिती कायम राहिली तर शेतकऱ्यांनी केलेला खर्च वायाही जाईल आणि शेतातील पिके पाण्यावाचून जळून जातील या भीतीपोटी शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. बँकेतील कर्जप्रकरणे प्रलंबित...आलेगाव ते खानोटा या भागातील ज्या शेतकऱ्यांची उजनी धरणातील पाणी परवानगीची मुदत संपली आहे, त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेतून दिली जाणारी कर्ज प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात आली आहेत. परिणामी आता शेतकऱ्यांना पिकांचे आर्थिक गणिते जुळविण्यासाठी लागणारी आर्थिक रसद बंद होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा उजनी धरणाच्या पाणी परवानगीबाबत संबंधित खात्याने वेळीच निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून पुढे येत आहे.