शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा ठणठणाट ; विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

ठळक मुद्देविद्यापीठ : कुलगुरूंच्या भेटीला मज्जाव केल्यामुळे विद्यार्थी संतप्त; घोषणाबाजीने परिसर दणाणला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.विद्यापीठातील वसतिगृहे, सामाजिकशास्त्रे इमारत, अभ्यासिकेसह इतर इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याची मागील सहा महिन्यांपासून समस्या आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले; मात्र कुलगुरू बैठकीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीच्या प्रवेद्वारावरच तीव्र आंदोलन सुरू केले. सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावले. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रवेशद्वारातच खुर्चीवर दगड ठेवून श्रद्धांजली सभा घेतली. या खुर्चीची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात डॉ. कुणाल खरात, अक्षय पाटील, अमोल दांडगे, लोकेश कांबळे, मयूर सोनवणे, दीपक बहिर, मनीषा मगरे, प्राजक्ता शेटे, सत्यजित मस्के, प्रशांत बोर्डे, गणेश शिंदे आदी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन स्थगितप्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यानंतरही प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी कोणीही आले नाही. बºयाच वेळेने विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, मुख्य अभियंता रवींद्र काळे, अशोक देशमाने आदींनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. एका दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. यावर विद्यार्थ्यांनी चार दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर कुलगुरूंच्या निवासस्थानावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.