शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

पाण्याचा ठणठणाट ; विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:37 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

ठळक मुद्देविद्यापीठ : कुलगुरूंच्या भेटीला मज्जाव केल्यामुळे विद्यार्थी संतप्त; घोषणाबाजीने परिसर दणाणला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहनशीलतेचा बुधवारी अंत झाला. अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीला टाळे ठोकत, प्रशासनाची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली. तेव्हा प्रशासन, कुलगुरूंच्या निषेध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.विद्यापीठातील वसतिगृहे, सामाजिकशास्त्रे इमारत, अभ्यासिकेसह इतर इमारतींमध्ये पिण्याच्या पाण्याची मागील सहा महिन्यांपासून समस्या आहे. पाण्यासाठी विद्यार्थ्यांना भटकंती करावी लागत आहे. या समस्येला वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ बुधवारी कुलगुरूंना भेटण्यासाठी गेले; मात्र कुलगुरू बैठकीत असल्यामुळे विद्यार्थ्यांना भेट नाकारली. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीच्या प्रवेद्वारावरच तीव्र आंदोलन सुरू केले. सुरक्षा विभागाच्या अधिकाºयांनी मुख्य प्रवेशद्वाराला टाळे लावले. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या पदाधिकाºयांनी प्रवेशद्वारातच खुर्चीवर दगड ठेवून श्रद्धांजली सभा घेतली. या खुर्चीची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यात डॉ. कुणाल खरात, अक्षय पाटील, अमोल दांडगे, लोकेश कांबळे, मयूर सोनवणे, दीपक बहिर, मनीषा मगरे, प्राजक्ता शेटे, सत्यजित मस्के, प्रशांत बोर्डे, गणेश शिंदे आदी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.आश्वासनानंतर आंदोलन स्थगितप्रवेशद्वाराला टाळे ठोकल्यानंतरही प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी कोणीही आले नाही. बºयाच वेळेने विशेष कार्य अधिकारी डॉ. वाल्मीक सरवदे, मुख्य अभियंता रवींद्र काळे, अशोक देशमाने आदींनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. एका दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन या अधिकाºयांनी दिले. यावर विद्यार्थ्यांनी चार दिवसांत ही मागणी पूर्ण झाली नाही, तर कुलगुरूंच्या निवासस्थानावर घागर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.