शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शहरात नवव्या दिवशीही ‘पाणीबाणी’

By admin | Updated: December 27, 2014 00:48 IST

औरंगाबाद : शहरातील पाण्याची ओरड अजून सुरूच आहे. नऊ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कंपनी टँकरने पाणी देत नाही. नळांना वेळेवर पाणी येत नाही.

औरंगाबाद : शहरातील पाण्याची ओरड अजून सुरूच आहे. नऊ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. कंपनी टँकरने पाणी देत नाही. नळांना वेळेवर पाणी येत नाही. त्यामुळे खाजगी टँकर्सकडून नागरिकांना पाण्याची गरज भागवावी लागली. पालिका दरबारी मात्र बैठकांचे राजकारण सुरू असून पाणीपुरवठ्यासाठी तोडगा काढण्याबाबत सूचना आणि आदेश देण्यापलीकडे काहीही करण्यात आलेले नाही. शिवसेना- भाजपा युतीच्या राजकीय आखाड्यात पाणीपुरवठा करणाऱ्या खाजगी कंपनीवर अंकुश कोण ठेवणार, हे शुक्रवारी स्पष्ट झाले नाही. भाजपाने आ. अतुल सावे यांना घेऊन पाहणी केली. त्यानंतर आज सकाळी भाजपाच्या नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना मारहाण केली. त्याच पावलावर पाऊल शिवसेना नगरसेवकांनी ठेवले. त्यांनी १०.०० वाजेच्या सुमारास अधिकाऱ्यांना चोपले. पाणीपुरवठ्यासाठी युती आक्रमक असल्याचे दाखवून देण्याच्या राजकीय नादात उपाययोजना पुढे आल्या. मात्र, त्यावर अंमलबजावणी केव्हा होणार हे स्पष्ट नाही. दुपारी ४.०० वाजेच्या सुमारास विश्रांतीनगरमधील महिलांनी टँकरच्या मागणीसाठी प्रभाग ‘ई’ कार्यालय आणि एन-५ जलकुंभावर आंदोलन केले. पैसे भरूनही टँकरने पाणीपुरवठा होत नाही, तर दुसरीकडे नवीन टँकरची नोंदणी केली जात नाही. टँकरने पाणीपुरवठा केला जावा या मागणीसाठी महिलांनी प्रभाग कार्यालयात जोरदार घोषणा देऊन आंदोलन केले. तेथे कुणीही अधिकारी प्रतिसाद देत नसल्याचे पाहून एन-५ जलकुंभावर आंदोलन केले. भारतनगर वॉर्डातील नवनाथनगर, समर्थनगर येथील नागरिकांनी आज उपमहापौर जोशी यांना निवेदन देऊन टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली. ड्राय फ्रायडे गेल्या शुक्रवारपासून या शुक्रवारपर्यंत पाण्याची बोंब आहे. शहरातील सर्वच भागांमध्ये आज नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. सोमवारी रात्री फारोळा येथील डिलिव्हरी लाईनला भगदाड पडल्यामुळे सिडको-हडकोसह सर्व शहरात पाण्याची बोंब झाली. गुरुवारी रात्री वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे शुक्रवारी नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागले. त्यामुळे तब्बल नऊ दिवस निर्जळीला सामोरे जावे लागल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. महागड्या टँकर्सचे पाणी त्यांना विकत घ्यावे लागले. नऊ दिवसांपासून २२ वॉर्डांमध्ये पाणीपुरवठा झालेला नाही. शुक्रवारीही त्या वॉर्डांपैकी बहुतांश ठिकाणी निर्जळी होती. नागरिकांना ३०० रुपयांप्रमाणे टँकर विकत घ्यावे लागले. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने मोफत टँकरने पाणीपुरवठा न केल्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.