शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभ देखरेखीखाली !

By admin | Updated: March 5, 2015 00:03 IST

लातूर : लातूर शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभ आहेत़ तर निलंगा व उदगीर शहरातही पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ तयार केले आहेत़

लातूर : लातूर शहरात पाणीपुरवठ्यासाठी पाच जलकुंभ आहेत़ तर निलंगा व उदगीर शहरातही पाणीपुरवठ्यासाठी जलकुंभ तयार केले आहेत़ मात्र या जलकुंभाची सुरक्षा व काळजी घेतली जात नसल्याची ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशननंतर निदर्शनास आले़ याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे पाचही जलकुंभ २४ तास देखरेखीखाली असतील याचे नियोजन केले जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याची योजना कालच महानगर पालिकेकडे आली आहे. मनपा व एमजीपीच्या कर्मचाऱ्यांत चर्चा करून जलकुंभावर २४ तास देखरेख ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी शहरातील पाचही जलकुंभावर कर्मचाऱ्यांचा पहारा होता.लातूर शहरातील गांधी चौकातील आणि यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या पाठीमागे असलेल्या जलकुंभावर कसलीही सुरक्षा नसल्याचे तसेच अस्वच्छता असल्याचे ‘लोकमत’ चमूने मंगळवारी केलेल्या स्टींग आॅपरेशननंतर उघडकीस आले आहे. याची दखल घेत बुधवारी मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी शहरातील पाचही जलकुंभाची माहिती घेतली. पाणी वितरणासाठी किती कर्मचारी आहेत. जलकुंभावर रक्षक म्हणून किती कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाच्या वेळा काय आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन कोण करते. जलकुंभावर २४ तास मनुष्यबळ ठेवण्यास काय अडचणी आहेत. आदी बाबींचा आढावा घेतला. १ मार्चपर्यंत पाणीपुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे होती. जलकुंभावरही त्यांचेच कर्मचारी आहेत. बिलभरणा केंद्रही त्यांचेच आहेत. कालच जीवन प्राधिकरणाकडून ही योजना मनपाकडे आली आहे. त्यामुळे दोघांचा विचार घेऊन जलकुंभावर २४ तास पहारा ठेवण्याचा निर्णय मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी घेतला आहे. गांधी चौकातील जलकुंभवर कर्मचारी असतात. नांदेड नाका येथील जलकुंभावरही कर्मचारी आहेत. बार्शी रस्त्यावरील जलकुंभावर जीवन प्राधिकरणाचे कार्यालयच आहे. त्यामुळे येथे कर्मचारी असतात. फक्त यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या आणि औसा रोड असलेल्या जलकुंभावर पहारा नाही. या दोन्ही ठिकाणी कर्मचारी ठेवण्याचे नियोजन केले जात असल्याची माहिती मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी दिली. ‘लोकमत’मुळे चांगला निर्णय घेतला असल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, बुधवारी शहरातील पाचही जलकुंभावर महानगरपालिकेचे कर्मचारी दिसून आले. आमच्या छायाचित्रकाराने गांधी चौक आणि नांदेड नाका तसेच यशवंतराव चव्हाण व्यापारी संकुलाच्या पाण्याच्या टाकीवर कालच्याप्रमाणे चढण्याचा प्रयत्न केला. पण आज त्यांना हटकण्यात आले. फोटो काढू नका, आमची नोकरी आहे, साहेब. काल तुम्हीच फोटो काढून पेपरात दिले. त्यामुळे आज दिवसभर आम्हाला येथे बसावे लागले आहे, असे म्हणून फोटो काढण्यास त्या कर्मचाऱ्याने विरोध केला.