शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

पाण्याचा अपव्यय; शेतीचेही नुकसान

By admin | Updated: May 16, 2017 00:06 IST

अणदूर : एकीकडे भीषण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असतानाच दुसरीकडे मात्र कालवा फुटून व झिरपून लाखो लिटर पाणी शेतशिवारात घुसले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअणदूर : एकीकडे भीषण उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असतानाच दुसरीकडे मात्र कालवा फुटून व झिरपून लाखो लिटर पाणी शेतशिवारात घुसले आहे. यामुळे येथील नागझरी परिसरातील अनेकांची शेतजमीन पाण्याखाली जावून चवाळे लागल्याने ही जमीन नापीक बनली आहे. असे असताना प्रशासनाने मात्र अद्याप याकडे पाहिले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. नळदुर्ग येथील कुरनूर प्रकल्पातून (बोरी धरण) उन्हाळी पिकांसाठी कालव्यामध्ये पाणी सोडण्यात येथे. परंतु, सन २०१४, २०१५ व २०१६ या वर्षांमध्ये दुष्काळ असल्यामुळे हे पाणी सोडण्यात आले नाही. गतवर्षी मुबलक पाऊस झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यामुळे यंदा उन्हाळी पिकांसाठी कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. याचा लाभ अणदूर, नळदुर्ग, वागदरी, येडोळा, खुदावाडी, शहापूर, गुजनूर, सराटी, धनगरवाडी, बाभळगाव आदी गावच्या शिवारातील शेतीला होतो. परंतु, हे पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची दुरूस्ती व्यवस्थित झाली नसल्यामुळे नागणखोरीनजिक कालवा फुटून लाखो लिटर पाणी अक्षरश: शेतात घुसले आहे. त्यामुळे अनेकांच्या जमिनीला चवाळ लागले आहे. अशा परिस्थितीत या भागातील शेतकरी खरीप पेरणीपूर्वीची मशागतही करू शकत नाही. ऊस पिकातील अंतर्गत मशागतीचे कामही चवाळ लागल्यामुळे बंदच आहे. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटकास बसत असून, प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, नुकसानीची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.