शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

फळबागांना टँकरने पाणी

By admin | Updated: April 20, 2016 23:50 IST

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़ अशाही प्रतिकुल परिस्थितीत जीवापाड सांभाळलेली फळबाग करपू लागल्याने मनाठा येथील संतोष मालीवाल या शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणी आणून फळबाग वाचविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे़गेली १०-१२ वर्षांपासून जोपासलेली मोसंबीचे ५०० बुड यावर्षी वाचविणे त्यांना कठीण झाले़ १५ एकर जमिनीमध्ये असलेल्या या फळबागेत इतर कोणतेही पीक घेता येत नाही़ त्यामुळे वर्षाचे उत्पन्न या फळबागेवर घ्यावे लागते़ वातावरण बदलामुळे गत दोन वर्षे गारांचा फटका बसला़ त्याचा उत्पन्नावर फरक पडला़ शेतामध्ये पाच सालगडी आहेत़ वर्षाकाठी त्यांना अडीच ती-तीन लाख रुपये द्यावे लागतात़ काढायचे कुठून ज्या शेतामध्ये ही फळबाग आहे़ तिथे ५० फुट खोलीची विहीर आहे, पण फळबागेला पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी दुसऱ्या शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे या विहिरीत आणून सोडण्याचा निर्णय घेतला़ यासाठी दिवसाआड पाचशे रुपये भाडे द्यावे लागते़ कधी तीन कधी चार फेऱ्या टँकरद्वारे केल्या जातात़ दोन्ही विहिरींचे मिळून हे पाणी फळबागेला देणे सुरू आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी कमीच पडत आहे, असे त्यांनी सांगितले़ उन्हाळा आणखी दीड महिना आहे़ त्यामुळे पाणी किती दिवस पुरेल सांगता येत नाही़ ५०० बुडापैकी किती झाडे मरतील सांगणे कठीण आहे़ परंतु आपल्या शेतातील उभे पीक मरू नये, यासाठी कर्जबाजारी होवून हा शेतकरी खर्च करतो आहे़ (वार्ताहर)मनाठा गाव डोंगराळ.जमिनीही हलक्या प्रतिच्याच़ पाण्याची व्यवस्थाही जेमतेमच़ कोरडवाहू जमिनी कसता कसता शेतकऱ्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात़ काही सुशिक्षित तरूण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवित असतात़ गेल्या तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई आहे़ शेतीत पेरलेलेही उगवले नाही, झालेला खर्चही निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी हताश झाला़ कामाअभावी मजुरांनी स्थलांतर केले, अशा अवघड स्थितीत संतोष मालीवाल या शेतकऱ्याने पाच किलो मीटर अंतरावरून टँकरद्वारे मोसंबीच्या झाडाला पाणी देणे सुरू केले़ गावातील मोठे प्रस्थ पण त्यांनाही पाणीटंचाईने बेजार केले़ शेतामध्ये तीन विहिरी, एक अटली, तर दोन विहिरींना जेमतेमच पाणी, दोन विहिरींचे अंतर पाच किलो मीटरचे, त्यामुळे एका विहिरीचे पाणी दुसऱ्या शेतातील पिकाच्या काय कामी पडणार?