शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

फळबागांना टँकरने पाणी

By admin | Updated: April 20, 2016 23:50 IST

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़ अशाही प्रतिकुल परिस्थितीत जीवापाड सांभाळलेली फळबाग करपू लागल्याने मनाठा येथील संतोष मालीवाल या शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणी आणून फळबाग वाचविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे़गेली १०-१२ वर्षांपासून जोपासलेली मोसंबीचे ५०० बुड यावर्षी वाचविणे त्यांना कठीण झाले़ १५ एकर जमिनीमध्ये असलेल्या या फळबागेत इतर कोणतेही पीक घेता येत नाही़ त्यामुळे वर्षाचे उत्पन्न या फळबागेवर घ्यावे लागते़ वातावरण बदलामुळे गत दोन वर्षे गारांचा फटका बसला़ त्याचा उत्पन्नावर फरक पडला़ शेतामध्ये पाच सालगडी आहेत़ वर्षाकाठी त्यांना अडीच ती-तीन लाख रुपये द्यावे लागतात़ काढायचे कुठून ज्या शेतामध्ये ही फळबाग आहे़ तिथे ५० फुट खोलीची विहीर आहे, पण फळबागेला पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी दुसऱ्या शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे या विहिरीत आणून सोडण्याचा निर्णय घेतला़ यासाठी दिवसाआड पाचशे रुपये भाडे द्यावे लागते़ कधी तीन कधी चार फेऱ्या टँकरद्वारे केल्या जातात़ दोन्ही विहिरींचे मिळून हे पाणी फळबागेला देणे सुरू आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी कमीच पडत आहे, असे त्यांनी सांगितले़ उन्हाळा आणखी दीड महिना आहे़ त्यामुळे पाणी किती दिवस पुरेल सांगता येत नाही़ ५०० बुडापैकी किती झाडे मरतील सांगणे कठीण आहे़ परंतु आपल्या शेतातील उभे पीक मरू नये, यासाठी कर्जबाजारी होवून हा शेतकरी खर्च करतो आहे़ (वार्ताहर)मनाठा गाव डोंगराळ.जमिनीही हलक्या प्रतिच्याच़ पाण्याची व्यवस्थाही जेमतेमच़ कोरडवाहू जमिनी कसता कसता शेतकऱ्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात़ काही सुशिक्षित तरूण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवित असतात़ गेल्या तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई आहे़ शेतीत पेरलेलेही उगवले नाही, झालेला खर्चही निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी हताश झाला़ कामाअभावी मजुरांनी स्थलांतर केले, अशा अवघड स्थितीत संतोष मालीवाल या शेतकऱ्याने पाच किलो मीटर अंतरावरून टँकरद्वारे मोसंबीच्या झाडाला पाणी देणे सुरू केले़ गावातील मोठे प्रस्थ पण त्यांनाही पाणीटंचाईने बेजार केले़ शेतामध्ये तीन विहिरी, एक अटली, तर दोन विहिरींना जेमतेमच पाणी, दोन विहिरींचे अंतर पाच किलो मीटरचे, त्यामुळे एका विहिरीचे पाणी दुसऱ्या शेतातील पिकाच्या काय कामी पडणार?