शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फळबागांना टँकरने पाणी

By admin | Updated: April 20, 2016 23:50 IST

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़ अशाही प्रतिकुल परिस्थितीत जीवापाड सांभाळलेली फळबाग करपू लागल्याने मनाठा येथील संतोष मालीवाल या शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणी आणून फळबाग वाचविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे़गेली १०-१२ वर्षांपासून जोपासलेली मोसंबीचे ५०० बुड यावर्षी वाचविणे त्यांना कठीण झाले़ १५ एकर जमिनीमध्ये असलेल्या या फळबागेत इतर कोणतेही पीक घेता येत नाही़ त्यामुळे वर्षाचे उत्पन्न या फळबागेवर घ्यावे लागते़ वातावरण बदलामुळे गत दोन वर्षे गारांचा फटका बसला़ त्याचा उत्पन्नावर फरक पडला़ शेतामध्ये पाच सालगडी आहेत़ वर्षाकाठी त्यांना अडीच ती-तीन लाख रुपये द्यावे लागतात़ काढायचे कुठून ज्या शेतामध्ये ही फळबाग आहे़ तिथे ५० फुट खोलीची विहीर आहे, पण फळबागेला पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी दुसऱ्या शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे या विहिरीत आणून सोडण्याचा निर्णय घेतला़ यासाठी दिवसाआड पाचशे रुपये भाडे द्यावे लागते़ कधी तीन कधी चार फेऱ्या टँकरद्वारे केल्या जातात़ दोन्ही विहिरींचे मिळून हे पाणी फळबागेला देणे सुरू आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी कमीच पडत आहे, असे त्यांनी सांगितले़ उन्हाळा आणखी दीड महिना आहे़ त्यामुळे पाणी किती दिवस पुरेल सांगता येत नाही़ ५०० बुडापैकी किती झाडे मरतील सांगणे कठीण आहे़ परंतु आपल्या शेतातील उभे पीक मरू नये, यासाठी कर्जबाजारी होवून हा शेतकरी खर्च करतो आहे़ (वार्ताहर)मनाठा गाव डोंगराळ.जमिनीही हलक्या प्रतिच्याच़ पाण्याची व्यवस्थाही जेमतेमच़ कोरडवाहू जमिनी कसता कसता शेतकऱ्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात़ काही सुशिक्षित तरूण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवित असतात़ गेल्या तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई आहे़ शेतीत पेरलेलेही उगवले नाही, झालेला खर्चही निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी हताश झाला़ कामाअभावी मजुरांनी स्थलांतर केले, अशा अवघड स्थितीत संतोष मालीवाल या शेतकऱ्याने पाच किलो मीटर अंतरावरून टँकरद्वारे मोसंबीच्या झाडाला पाणी देणे सुरू केले़ गावातील मोठे प्रस्थ पण त्यांनाही पाणीटंचाईने बेजार केले़ शेतामध्ये तीन विहिरी, एक अटली, तर दोन विहिरींना जेमतेमच पाणी, दोन विहिरींचे अंतर पाच किलो मीटरचे, त्यामुळे एका विहिरीचे पाणी दुसऱ्या शेतातील पिकाच्या काय कामी पडणार?