शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजनेला लागले गळतीचे ग्रहण !

By admin | Updated: July 24, 2014 00:13 IST

उमरगा : शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी माकणी धरणातून तब्बल २३ कोटी रुपये खर्च करुन योजना राबविण्यात आली आहे.

उमरगा : शहराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी माकणी धरणातून तब्बल २३ कोटी रुपये खर्च करुन योजना राबविण्यात आली आहे. मात्र या योजना कार्यान्वित होवून काही महिन्यांचा कालावधी लोटलेला असतानाच ठिकठिकाणी गळती लागली आहे. त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा मागील दहा दिवसांपासून बंद पडला असून, नागरिकांना तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे.शहराची लोकसंख्या ५० हजाराच्या आसपास आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता, २३ कोटी रुपये खर्च करुन माकणी धरणातून पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली. भीषण टंचाईच्या काळात ही योजना युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला प्रतिदिन ३० लाख लिटर पाणी धरणातून उचलले जात होते. हे पाणी शहरातील ५ हजारावर नळकनेक्शन धारकांना पुरवठा करण्यात येत होते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेला जागोजागी गळती लागली आहे. एका ठिकाणची गळती दुरुस्त करेपर्यंत दुसऱ्या ठिकाणी सुरु होत आहे. माकणी ते समुद्राळ या २७ कि.मी. अंतरासाठी २००४-०५ साली १२ इंची लोखंडी पाईपलाईन करण्यात आली आहे. सास्तूर, माकणी, समुद्राळ आणि कोंडजीगड या रस्त्याचे व दूरसंचारचे वायर टाकण्यासाठी खोदकाम सुरु असताना या पाईपलाईनला सतत गळती लागत आहे. गेल्या सात दिवसांपासून कोंडजीगड, समुद्राळ, नागराळ या भागातील दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. समुद्राळ व नागराळ येथील काम पूर्ण झाले असून, कोंडजीगड येथील गळती काढण्याचे काम बुधवारी दिवसभर सुरु होते. दरम्यान, यासंदर्भात नगराध्यक्षा केवळबाई औरादे यांच्याशी संपर्क साधला असता, दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली असून, गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे त्या म्हणाल्या.तीव्र पाणीटंचाईजलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे मागील आठ दिवसांपासून शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालेला आहे. पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे उमरगेकरांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दुरुस्तीसाठी साहित्य नाहीजलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेकडे आवश्यक साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे पाईपलाईनची गळती काढण्यास विलंब होत आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे शिरगुरे यांनी सांगितले. आणखी पाच दिवस लागणारपाईपलाईनची गळती काढण्याचे काम मागील सात दिवसांपासून सुरु आहे. ते अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या पाच दिवसांमध्ये हे काम पूर्ण करुन टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे पाणी पुरवठ्याचे शाखा अभियंता स्वामी यांनी सांगितले.जलकुंभात ठणठणाटसमुद्राळ येथे १९९२-९३ साली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून ६८ लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले आहे. मात्र जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे सदरील जलकुंभामध्ये ठणठणाट आहे.