शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:58 IST

रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

गावातील मातोश्रीनगर, पवननगर या भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नळाला विद्युत पंप लावून पाणी भरले जात असल्यामुळे अनेक वसाहतींतील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने जवळपास दीड हजार मोटारी जप्त केल्या होत्या. दरम्यान, मोटारी जप्त होऊनही गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पदरमोड करून जार अथवा टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज मंगळवारी मातोश्रीनगर-पवननगर या भागातील संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकले. पाणीपट्टी भरूनही नियमितपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोप करीत महिला व नागरिकांनी सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजूळ, ग्रामविकास अधिकारी एस.एन. रोहकले यांना धारेवर धरले होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याचे आंदोलनकर्त्या नागरिकांना सांगितले. सर्व वसाहतींत टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. या आंदोलनात मिलिंद सिरसाठ, अली सय्यद, सुशीला जाधव, आरती जाधव, उज्ज्वला जाधव, वंदना गोरे, स्वाती जाधव आदींनी सहभाग नोंदविला होता. 

टॅग्स :Walujवाळूज