शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:58 IST

रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

गावातील मातोश्रीनगर, पवननगर या भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नळाला विद्युत पंप लावून पाणी भरले जात असल्यामुळे अनेक वसाहतींतील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने जवळपास दीड हजार मोटारी जप्त केल्या होत्या. दरम्यान, मोटारी जप्त होऊनही गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पदरमोड करून जार अथवा टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज मंगळवारी मातोश्रीनगर-पवननगर या भागातील संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकले. पाणीपट्टी भरूनही नियमितपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोप करीत महिला व नागरिकांनी सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजूळ, ग्रामविकास अधिकारी एस.एन. रोहकले यांना धारेवर धरले होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याचे आंदोलनकर्त्या नागरिकांना सांगितले. सर्व वसाहतींत टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. या आंदोलनात मिलिंद सिरसाठ, अली सय्यद, सुशीला जाधव, आरती जाधव, उज्ज्वला जाधव, वंदना गोरे, स्वाती जाधव आदींनी सहभाग नोंदविला होता. 

टॅग्स :Walujवाळूज