शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रांजणगावातील पाणीपुरवठा सुरळीत होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:58 IST

रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय गाठून रोष व्यक्त केला.

गावातील मातोश्रीनगर, पवननगर या भागात आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठ्याचे व्यवस्थित नियोजन केले जात नसल्याने दिवसेंदिवस गावातील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

विशेष म्हणजे दोन महिन्यांपूर्वी नळाला विद्युत पंप लावून पाणी भरले जात असल्यामुळे अनेक वसाहतींतील नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे केल्या होत्या. या तक्रारीनंतर ग्रामपंचायतीने जवळपास दीड हजार मोटारी जप्त केल्या होत्या. दरम्यान, मोटारी जप्त होऊनही गावातील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांना पदरमोड करून जार अथवा टँकरचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.

पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे आज मंगळवारी मातोश्रीनगर-पवननगर या भागातील संतप्त नागरिक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन धडकले. पाणीपट्टी भरूनही नियमितपणे पाणीपुरवठा केला जात नसल्याचा आरोप करीत महिला व नागरिकांनी सरपंच संजीवनी सदावर्ते, उपसरपंच अशोक शेजूळ, ग्रामविकास अधिकारी एस.एन. रोहकले यांना धारेवर धरले होते.

यावेळी ग्रामविकास अधिकारी रोहकले यांनी एमआयडीसीने पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे पाणीपुरवठ्यात अडचण येत असल्याचे आंदोलनकर्त्या नागरिकांना सांगितले. सर्व वसाहतींत टप्प्या-टप्प्याने पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्ते माघारी परतले. या आंदोलनात मिलिंद सिरसाठ, अली सय्यद, सुशीला जाधव, आरती जाधव, उज्ज्वला जाधव, वंदना गोरे, स्वाती जाधव आदींनी सहभाग नोंदविला होता. 

टॅग्स :Walujवाळूज