शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एप्रिल महिन्यांत ४ ते ६ दिवसच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:04 IST

औरंगाबाद : एप्रिल महिन्यांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या घशाला कोरड दिली. शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, महिनाभरात केवळ ४ ...

औरंगाबाद : एप्रिल महिन्यांत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांच्या घशाला कोरड दिली. शहराचे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, महिनाभरात केवळ ४ ते ६ दिवसच पाणीपुरवठा झाला आहे.

जलवाहिनी फुटणे, वीज नसणे यांसारख्या कारणांमुळे जुन्या भागासह सर्व शहराचे नियोजन फिसकटल्याचे सांगण्यात येत आहे.

पाणीपुरवठ्याचा पडलेला खंड भरून काढण्यासाठी काहीही प्रयत्न न झाल्यामुळे काही वसाहतींतील नागरिकांवर टँकर घेण्याची तर कुठे पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. लॉकडाऊन असल्यामुळे पाण्याची मागणी वाढलेली असताना प्रशासकीय यंत्रणा कमी पडते आहे.

११५ वॉर्डांपैकी ७० टक्के वॉर्डांतच नळाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे पालिकेला शक्य आहे. उर्वरित वॉर्डांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. असे असतानाही पूर्ण शहराला चार दिवसांनीदेखील नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची ओरड नागरिक करीत आहेत.

पुंडलिकनगर जलकुंभावरून सातव्या दिवशी पुरवठा

पुंडलिकनगर जलकुंभावरून गुरुवारी पाणीपुरवठा करण्यात आला होता. गेल्या शुक्रवारी या भागातील वॉर्डांना पाणीपुरवठा झाला. गुरुवारी पहाटे ५ वाजता पाणीपुरवठ्याची वेळ होती. ६ वाजता पाणी आले आणि ६.४५ वाजता नळ गेले. महावितरण कंपनीच्या डीपीचा वीजपुरवठा खंडित झाल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले, परंतु मुळात जलकुंभातच पाणी कमी आले होते.

सिडको-हडकोतही पाण्याची बोंब

सिडको-हडकोतही पाणीपुरवठ्याची बोंब सुरू आहे. गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या जम्बो शिष्टमंडळाने पालिका प्रशासकांची भेट घेऊन सुरळीत पाणीपुरवठ्याची मागणी केली होती. त्यानंतरही खूप काही परिणाम झालेला नाही. एन-३, एन-४, गुरूसहानीनगर, पारिजातनगर मधील बहुतांश भागांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही.

कार्यकारी अभियंत्यांची माहिती अशी

कार्यकारी अभियंता के. एम. फालक यांना विचारले असता, या महिन्यांत जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. गुरुवारी काही भागांना कमी दाबाने पाणी दिले गेले. जायकवाडीकडून येणाऱ्या पाण्याला प्रेशर कमी होते, त्यामुळे कमी वेळ पाणी दिले गेले. सिडको-हडकोमुळे पुंडलिकनगर जलकुंभावरील पाणीपुरवठा कमी केलेला नाही, असा दावाही त्यांनी केला.