शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
4
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
5
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
6
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
7
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
8
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
9
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
11
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
12
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
13
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
14
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
15
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
16
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
17
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
18
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
19
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी

डिसेंबरपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा

By admin | Updated: September 13, 2014 00:10 IST

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़

नांदेड : विष्णूपुरी प्र्रकल्प शंभर टक्के भरल्यामुळे नांदेडकरांना १५ सप्टेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला़ शहराला डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़ महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती उमेश पवळे यांनी मागील आठवड्यात झालेल्या स्थायी सभेत एक दिवसआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला़ त्यानंतर आयुक्तांनी १५ सप्टेंबरपासून शहराला एक दिवसाआड पाणी सोडण्याचे जाहीर केले आहे़ सणासुदीच्या काळात नागरिकांना मुबलक पाणी मिळावे यासाठी डिसेंबर २०१४ पर्यंत एक दिवसआड पाणी सोडण्यात येणार आहे़ सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे़ पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे - विषम दिनांक १५ , १७, १९, २१ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या दक्षिणेकडील भाग, वजिराबाद, गुरूद्वारा परिसर, इतवारा, गाडीपुरा, खुदबईनगर, होळी, चौफाळा, रंगारगल्ली, सिद्धनाथपुरी, गणिमपुरा, सिद्धार्थनगर, खडकपुरा, दुल्लेशाह रहेमाननगर, गोलचाळ, गंगाचाळ, पक्कीचाळ, सोमोश कॉलनी, मीलरोड, गोवर्धनघाट, देगावचाळ, चिखलवाडी, डॉक्टरलेन, गवळीपुरा, शिंधी कॉलनी, बाफनारोड, अबचलनगर, दशमेशनगर, महेबुबीयाकॉलनी, पाकिजानगर, एकबालनगर, मिल्लतनगर, गाडेगावरोड, छत्रपतीनगर जलकुंभावरील भाग, तरोडा खु़ भाग, शोभानगर, पौर्णिमानगर, हनुमानगड, व्हीआयपीरोड, गोकुळनगर, दत्तनगर,नवामोंढा व सिडको भाग़ सम दिनांक१६, १८, २०, २२ सप्टेंबर या प्रमाणे रेल्वे लाईनच्या उत्तरेकडील भाग, गणेशनगर, रामानंदनगर, विजयनगर, यशवंतनगर, राजनगर, कैलासनगर, निजामकॉलनी, अशोकनगर, आनंदनगर, श्यामनगर, हर्षनगर, शाहूनगर - बाबानगर, वसंतनगर, मगणपुरा, शिवाजीनगर, नईआबादी, विसावानगर, रविराजनगर, कल्याणनगर, सन्मित्रकॉलनी, प्रभातनगर, स्नेहनगर आदी़ (प्रतिनिधी)विष्णूपुरी प्रकल्प शंभर टक्के भरले असले तरी पुढील पावसाळ्यापर्यंत या प्रकल्पातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे लागणार आहे़ यंदा अडीच महिने पावसाने हुलकावणी दिल्यामुळे विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ८ दलघमी पाणी शिल्लक राहिले होते़ त्यामुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती़ मात्र उशिरा झालेल्या पावसाने प्रकल्प पूर्णपणे भरले़ त्यामुळे हे पाणी टिकविण्यासाठी योग्य काळजी घेण्याची गरज आहे़ शहराला नियोजन करून पाणी सोडणे, नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करणे, पाण्याचा अपव्यय थांबविणे, फुटलेले पाईपलाईन तात्काळ दुरूस्ती करणे, आदी कामांसाठी समिती स्थापन करावी, अशी मागणी येथील नागरिक नंदकुमार चालिकवार यांनी केली आहे़