शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

औरंगाबादमध्ये अर्ध्या तासात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 21:10 IST

अर्धा तास पडलेल्या पावसामुळे अर्ध्या शहरात पाणीच पाणी झाले. पुंडलिकनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, हुसैन कॉलनी, दूध डेअरी चौक या भागांतील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून दुकानांमध्ये पाणी शिरले.

ठळक मुद्देपावसाची कृपा मंगळवारीदेखील कायम

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरावर असणारी पावसाची कृपा मंगळवारीदेखील कायम राहिली. दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे अर्ध्या शहरात पाणीच पाणी झाले. पुंडलिकनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, हुसैन कॉलनी, दूध डेअरी चौक या भागांतील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून दुकानांमध्ये पाणी शिरले.चिकलठाणा विमानतळावरील नोंदीप्रमाणे या अर्ध्या तासात ७ मि.मी. पाऊस पडला; मात्र मुख्य शहरामध्ये पावसाचे प्रमाण यापेक्षा खूप अधिक असण्याची शक्यता आहे. नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागला. ऐन दुपारीच पावसाने झोडपल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली. पावसाचा जोर एवढा होता की, लोकांना आसरा शोधण्यापूर्वीच भिजावे लागले.यंदाच्या पावसाने मनपाच्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ची पुरती वाट लावली आहे. भूमिगत गटारे व नाल्यांची सफाई आणि योग्य निगा न राखल्यामुळे रस्त्यांवर पाणी जमा होत आहे. घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे. आतापर्यंत औरंगाबाद तालुक्यात ५१६.०५ मि.मी. पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने रविवारी मराठवाड्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.