शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

औरंगाबादमध्ये अर्ध्या तासात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 21:10 IST

अर्धा तास पडलेल्या पावसामुळे अर्ध्या शहरात पाणीच पाणी झाले. पुंडलिकनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, हुसैन कॉलनी, दूध डेअरी चौक या भागांतील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून दुकानांमध्ये पाणी शिरले.

ठळक मुद्देपावसाची कृपा मंगळवारीदेखील कायम

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून शहरावर असणारी पावसाची कृपा मंगळवारीदेखील कायम राहिली. दुपारी १ वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या या पावसामुळे अर्ध्या शहरात पाणीच पाणी झाले. पुंडलिकनगर, न्यायनगर, जयभवानीनगर, हुसैन कॉलनी, दूध डेअरी चौक या भागांतील रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून दुकानांमध्ये पाणी शिरले.चिकलठाणा विमानतळावरील नोंदीप्रमाणे या अर्ध्या तासात ७ मि.मी. पाऊस पडला; मात्र मुख्य शहरामध्ये पावसाचे प्रमाण यापेक्षा खूप अधिक असण्याची शक्यता आहे. नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी वेळ लागला. ऐन दुपारीच पावसाने झोडपल्याने लोकांची चांगलीच गैरसोय झाली. पावसाचा जोर एवढा होता की, लोकांना आसरा शोधण्यापूर्वीच भिजावे लागले.यंदाच्या पावसाने मनपाच्या ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ची पुरती वाट लावली आहे. भूमिगत गटारे व नाल्यांची सफाई आणि योग्य निगा न राखल्यामुळे रस्त्यांवर पाणी जमा होत आहे. घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे आर्थिक नुकसानही होत आहे. आतापर्यंत औरंगाबाद तालुक्यात ५१६.०५ मि.मी. पाऊस झाला आहे. भारतीय हवामान खात्याने रविवारी मराठवाड्यात पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.