शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

उद्योगाच्या वाहिनीतून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:06 IST

समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देनवीन पर्याय : आयुक्त करणार उद्योग सचिवांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.शहराची लोकसंख्या १५ ते १६ लाखांपर्यंत गेली आहे. महापालिकेकडे ११० ते १२० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. दररोज शहराची मागणी २०० एमएलडी पाण्याची आहे. मागील काही वर्षांपासून महापालिका विविध वसाहतींमध्ये तीन दिवसाआड, पाच दिवसाआड पाणी देत आहे. उन्हाळा सुरू होताच पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. त्याची चाहूल महापालिकेला आतापासूनच लागली आहे. समांतर जलवाहिनीचा निर्णय लागेपर्यंत डीएमआयसीने पैठण ते शेंद्रा अशी नवीन जलवाहिनी टाकली आहे. नक्षत्रवाडी किंवा फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारून हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. डीएमआयसीने पैठण, कचनेर मार्गे शेंद्रापर्यंत ५५ कि.मी.ची जलवाहिनी उभारली आहे. जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सध्या शेंद्रा एमआयडीसीला दररोज ९० ते ९५ एमएलडी या जलवाहिनीतून पाणी मिळणार आहे. सध्या एमआयडीसीला या पाण्याची गरज नाही. जेव्हा या भागात शंभर टक्के उद्योग सुरू होतील तेव्हाच पाण्याची गरज भासणार आहे. तेव्हापर्यंत हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याचा अंदाज घेण्यात येईल, असेही मुगळीकर यांनी नमूद केले.उद्योगमंत्र्यांची मदत घेणारशहरातील पाणीप्रश्न सुटावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून डीएमआयसीचे पाणी शहराला वापरता येऊ शकते का याचा विचार करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. शहरातील ४० टक्के वसाहतींना आजही महापालिका पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.