शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाच्या वाहिनीतून औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:06 IST

समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देनवीन पर्याय : आयुक्त करणार उद्योग सचिवांसोबत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समांतर जलवाहिनीचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिका आणि राज्य शासनाला या प्रकरणात कोणताही अंतिम निर्णय घेता येत नाही. यंदा उन्हाळ्यात पाण्यासाठी शहरात मोठी बोंबाबोंब होणार आहे. त्यापूर्वी डीएमआयसीने पैठणपासून शेंद्रापर्यंत टाकलेली जलवाहिनी शहरासाठी वापरता येऊ शकते का याची चाचपणी करण्यात येईल. यासंदर्भात लवकरच उद्योग विभागाचे सचिव सुनील पोरवाल यांच्यासोबत चर्चा करण्याचा मनोदय मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांनी व्यक्त केला.शहराची लोकसंख्या १५ ते १६ लाखांपर्यंत गेली आहे. महापालिकेकडे ११० ते १२० एमएलडी पाणी उपलब्ध आहे. दररोज शहराची मागणी २०० एमएलडी पाण्याची आहे. मागील काही वर्षांपासून महापालिका विविध वसाहतींमध्ये तीन दिवसाआड, पाच दिवसाआड पाणी देत आहे. उन्हाळा सुरू होताच पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. त्याची चाहूल महापालिकेला आतापासूनच लागली आहे. समांतर जलवाहिनीचा निर्णय लागेपर्यंत डीएमआयसीने पैठण ते शेंद्रा अशी नवीन जलवाहिनी टाकली आहे. नक्षत्रवाडी किंवा फारोळा येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारून हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याची चाचपणी करण्याचा मनोदय आयुक्तांनी व्यक्त केला. डीएमआयसीने पैठण, कचनेर मार्गे शेंद्रापर्यंत ५५ कि.मी.ची जलवाहिनी उभारली आहे. जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सध्या शेंद्रा एमआयडीसीला दररोज ९० ते ९५ एमएलडी या जलवाहिनीतून पाणी मिळणार आहे. सध्या एमआयडीसीला या पाण्याची गरज नाही. जेव्हा या भागात शंभर टक्के उद्योग सुरू होतील तेव्हाच पाण्याची गरज भासणार आहे. तेव्हापर्यंत हे पाणी शहरासाठी वापरता येऊ शकते का? याचा अंदाज घेण्यात येईल, असेही मुगळीकर यांनी नमूद केले.उद्योगमंत्र्यांची मदत घेणारशहरातील पाणीप्रश्न सुटावा यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून डीएमआयसीचे पाणी शहराला वापरता येऊ शकते का याचा विचार करण्यात येईल, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. शहरातील ४० टक्के वसाहतींना आजही महापालिका पाणी देऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.