शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

चिंचोली लिंबाजी परिसरात हिवाळ्यातच पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:13 IST

जामडी (ज.)सह अनेक गावांची तहान भागावणारा गणेशपूर लघु प्रकल्प कोरडा पडल्याने ऐन हिवाळ्यात शेलगाव, दिगाव येथे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचोली लिंबाजी : जामडी (ज.)सह अनेक गावांची तहान भागावणारा गणेशपूर लघु प्रकल्प कोरडा पडल्याने ऐन हिवाळ्यात शेलगाव, दिगाव येथे पाणीटंचाईचे भीषण संकट निर्माण झाले आहे. पाणीपुरवठ्याच्या विहिरींनी तळ गाठल्याने ६ दिवसांआड, तर कुठे ८ दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी थंडीत कुडकुडत ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे.दरवर्षी कमी पर्जन्यमान, त्यातच भूगर्भातील सतत खालावणारी पाणीपातळी यामुळे गणेशपूर, जामडी, दहिगाव, शेलगाव, दिगाव, खेडी या भागातील विहिरी ऐन हिवाळ्यातच तळ गाठत आहेत. यंदाही वरुणराजाची अवकृपा झाल्याने येथील नदी, नाले, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट बंधारे कोरडेच राहिले. येथील पाणी प्रश्न गणेशपूर लघु प्रकल्पावर अवलंबून असतो.मात्र, प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पूर्ण पावसाळ्यात या प्रकल्पाच्या पाणीपातळीत एक इंचही वाढ झाली नाही.सध्या प्रकल्प कोरडा पडला आहे. यामुळे या प्रकल्पाखालील शेलगाव, दिगाव आदी गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.गत सात-आठ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने ग्रामस्थांचे पाण्याविना हाल होत आहेत. हंडाभर पाण्यासाठी कामधंदा सोडून वणवण भटकंती करावी लागत आहे. शेलगावचे माजी उपसरपंच तथा ग्रामपंचयात सदस्य विठ्ठल मनगटे म्हणाले की, सध्याची विहिरींची पाणीपरिस्थिती पाहता फेब्रुवारीमध्ये गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असून, प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ विहीर अधिग्रहित करून पाणीटंचाई दूर करावी.शेलगाव, दिगाव दोन्ही गावांना विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा करण्यात यावा, यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक पी.आर. दहीहंडे यांनी दिली.