शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

वैजापूर तालुक्यात उन्हाच्या चटक्याअगोदरच पाणीटंचाईच्या झळा असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:54 IST

उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.

मोबीन खानवैजापूर : उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.तालुक्यातील पंधरा गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे दाखल केले आहेत. यातील चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारीस्तरावर मंजुरीसाठी आहेत.सध्या आठ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीपुरवठा करण्यासाठी बारा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तालुक्यातील लासूरगाव येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले होते. त्यांनतर टँकरच्या मागणीत वाढ होत गेली. नांदूर -मधमेश्वर भागात कॅनलच्या पाण्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर नसली तरी तालुक्याचा उर्वरित डोंगरथडी व शिवना थडी हा भाग कोरडा आहे. या भागातील मन्याडचा अपवाद वगळता सर्व धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने तेथील नागरिकांना उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतावरच तहान भागवावी लागत आहे. मन्याड धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. पण या धरणातून पाणी उचलण्याची कोणतीही तांत्रिक प्रक्रिया शासनस्तरावर न करण्यात आल्याने या भागातील गावांची अवस्था दरवर्षी टंचाईग्रस्त होते व शासनाला टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. विशेष म्हणजे याबाबत लोकप्रतिनिधीदेखील उदासिन असल्याचे चित्र आहे.टँकर सुरु असलेली गावेसद्यस्थितीत लासूरगाव, हडसपिंपळगाव, राहेगाव, सोनवाडी, उंदीरवाडी, पेंडेफळ, बाभूळगाव बु. व बळ्हेगाव या गावांना नऊ टँकरने पाणी पुरवले जात आहे. बाभुळगाव बु., जळगाव, शहाजतपूर, अमानतपूरवाडी यांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहेत. नालेगाव, धोंदलगाव, मालेगाव कन्नड, शिवराई, खिर्डी, हरगोविंदपूर व नारळा या गावांनी टँकरसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के.पी.कड यांनी दिली. दरम्यान, येत्या काही दिवसांत उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या मागणीत वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात साठ टँकरद्वारे तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. बाबतरा येथे दूषित पाण्याचा स्त्रोत असल्याने त्या ठिकाणी जवळपास बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होत होता. पण येथील टँकर प्रशासनाने आता बंद केले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे पाणी शुद्वीकरणाचा प्लँट बसविण्यात येणार आहे. त्याचा खर्च जवळपास २५ लाख रुपये इतका आहे.