शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वैजापूर तालुक्यात उन्हाच्या चटक्याअगोदरच पाणीटंचाईच्या झळा असह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:54 IST

उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.

मोबीन खानवैजापूर : उन्हाचे चटके जाणवायला लागण्याअगोदरच वैजापूर तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. जानेवारी महिन्यापासूनच तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु असून आता उन्हाच्या झळा वाढल्याने ग्रामीण भागाची तहानही वाढली आहे.तालुक्यातील पंधरा गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे दाखल केले आहेत. यातील चार गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारीस्तरावर मंजुरीसाठी आहेत.सध्या आठ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून पाणीपुरवठा करण्यासाठी बारा विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जानेवारी महिन्यात तालुक्यातील लासूरगाव येथे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले होते. त्यांनतर टँकरच्या मागणीत वाढ होत गेली. नांदूर -मधमेश्वर भागात कॅनलच्या पाण्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर नसली तरी तालुक्याचा उर्वरित डोंगरथडी व शिवना थडी हा भाग कोरडा आहे. या भागातील मन्याडचा अपवाद वगळता सर्व धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने तेथील नागरिकांना उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतावरच तहान भागवावी लागत आहे. मन्याड धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा आहे. पण या धरणातून पाणी उचलण्याची कोणतीही तांत्रिक प्रक्रिया शासनस्तरावर न करण्यात आल्याने या भागातील गावांची अवस्था दरवर्षी टंचाईग्रस्त होते व शासनाला टँकरवर लाखो रुपये खर्च करावे लागतात. विशेष म्हणजे याबाबत लोकप्रतिनिधीदेखील उदासिन असल्याचे चित्र आहे.टँकर सुरु असलेली गावेसद्यस्थितीत लासूरगाव, हडसपिंपळगाव, राहेगाव, सोनवाडी, उंदीरवाडी, पेंडेफळ, बाभूळगाव बु. व बळ्हेगाव या गावांना नऊ टँकरने पाणी पुरवले जात आहे. बाभुळगाव बु., जळगाव, शहाजतपूर, अमानतपूरवाडी यांचे टँकरचे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात आले आहेत. नालेगाव, धोंदलगाव, मालेगाव कन्नड, शिवराई, खिर्डी, हरगोविंदपूर व नारळा या गावांनी टँकरसाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव दाखल केले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता के.पी.कड यांनी दिली. दरम्यान, येत्या काही दिवसांत उन्हाच्या तीव्रतेमुळे टँकरच्या मागणीत वाढ होऊ शकते. गेल्या वर्षी उन्हाळ्यात साठ टँकरद्वारे तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. बाबतरा येथे दूषित पाण्याचा स्त्रोत असल्याने त्या ठिकाणी जवळपास बारा महिने टँकरने पाणीपुरवठा होत होता. पण येथील टँकर प्रशासनाने आता बंद केले आहेत. ग्रामपंचायतीतर्फे पाणी शुद्वीकरणाचा प्लँट बसविण्यात येणार आहे. त्याचा खर्च जवळपास २५ लाख रुपये इतका आहे.