शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

शाळांत पाणीटंचाई; विद्यार्थ्यांची गैरसोय

By admin | Updated: February 23, 2016 23:57 IST

हिंगोली : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी खालावली असून अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत.

हिंगोली : मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढत आहे. परिणामी, पाणीपातळी खालावली असून अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत. त्यामुळे शाळेत पाणीटंचाई निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचे पाण्यावाचून गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात निसर्गाच्या अवकृपेमुळे मागील काही वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आले आहे. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या संकटात सापडला असून पाणीपातळी खालावली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. जिल्ह्यामध्ये जि. प. च्या एकूण ८८० शाळांत १ लाख १३ हजार ७४४ तर इतर शाळांतून १ लाख ३६ हजार ७११ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. परंतु अनेक शाळांतील हातपंप व बोअर कोरडे पडले आहेत. त्यात पाणीपातळी खालावल्याने दिवसेंदिवस पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. डिसेंबर महिन्यातच बोअर-हातपंप कोरडे पडल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर उपाययोजना करून विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरेल या पद्धतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही, परंतु अनेक शाळामध्ये पाण्याची सुविधा नाही, त्यात हातपंप व बोअरही कोरडे पडल्याने विद्यार्थी घरूनच पाणी पिण्यास आणत आहेत, किंवा जवळपास पाण्याचा शोध घेऊन तहान भागवत असल्याचे सध्या चित्र आहे.याबाबत सर्व शिक्षा अभियानच्या लेखा विभागाकडे विचारणा केली असता, त्यांनी सर्वच शाळेवर पाण्याची व्यवस्था असल्याचे सांगितले. तसेच हातपंप, विहिरी व नळाची सुविधा आहे. परंतु त्यांना पाणी आहे की, नाही याची माहिती आमच्या विभागाकडे नसते असे सांगून टोलवाटोलवीची उत्तरे दिली. त्यामुळे शाळेतील पाणीप्रश्न संबंधित अधिकारी व कर्मचारी किती गांभीर्याने घेत आहेत, हे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)शिक्षणाधिकारी गंगाधर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, यावर्षी अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने निश्चितच पाणीटंचाई शाळेत उद्भवली असेल. त्यामुळे येत्या काही दिवसांतच बैठक बोलावून यावर उपाययोजना करण्यात येईल. तसेच संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देऊन शाळेतील पाणीप्रश्न सोडवू, असे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.