शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वाळूज परिसरात पाणीटंचाई

By admin | Updated: July 23, 2014 00:40 IST

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत.

वाळूज महानगर : पावसाने पाठ फिरविल्यामुळे तलाव कोरडे पडले आहेत. तलावात पाणी नसल्यामुळे पेयजल योजनाही कामाच्या राहिलेल्या नाहीत. नागरिकांना व मुक्या जनावरांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.पावसाळा सुरू होऊन दीड महिना लोटला तरी एकही दमदार पाऊस झालेला नाही. भूगर्भातील पाणीपातळी खोल जात आहे. परिसरातील हातपंप, विहिरी व बोअरवेल्सने तळ गाठला आहे. तर काही विहिरी पूर्ण आटल्याआहेत.काही बोअरवेलचे पाणी कारखान्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी पाझरल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सर्वस्वी एमआयडीसीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. नागरिक पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी एमआयडीसीच्या गळक्या जलवाहिनीचे वापरतात. काही ठिकाणी टँकरचालक राजकीय पुढारी किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या घराजवळ थांबवत असल्यामुळे गरीब नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पाऊस न झाल्यामुळे गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीची पेयजल योजनाही तलावात पाणी नसल्याने उपयोगाची राहिलेली नाही. कारखान्यांचे पाणीबंद करावेऔद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखान्यांमध्ये गरजेपेक्षा जास्त पाणी वापरले जाते. कारखान्यांपेक्षा नागरिकांना पाण्याची जास्त गरज आहे. प्रशासनाने दारू, बीअर कारखान्यांचा पाणीपुरवठा बंद करून नागरिकांना ते द्यावे. -प्रकाश जाधव, कामगार नेते पाणी जपून वापरावेपावसाअभावी जलसाठे आटले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. त्यामुळे आहे ते पाणी नागरिकांनाी काटकसरीने वापरावे. -सुनील काळे, उपसरपंच , वडगाव कोल्हाटीपर्यावरणाचे संतुलन गरजेचेपर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी दीर्घायुषी झाडे लावण्याची गरज आहे. आज कोट्यवधी रुपये झाडे लावण्यावर खर्च केले जातात; पण त्यांची जोपासना होणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे पाऊस पडत नाही. दारू, बीअर कंपनीचे पाणी बंद करून ते नागरिकांना पिण्यासाठी द्यावे. -सुरेश फुलारे, लघुउद्योजक