शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

बदनापूर तालुक्यात पाणीटंचाई

By admin | Updated: July 24, 2014 00:14 IST

दिलीप सारडा , बदनापूर पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

दिलीप सारडा , बदनापूरपावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुध्दा बदनापूर तालुक्यात पाऊस न झाल्याने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.तालुक्यात यावर्षी अत्यंत अल्प प्रमाणात पाऊस झाला. काही भागात अद्यापही पेरणी झालेली नाही. तालुक्यात काही भागात थोडासा पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस, तूर, बाजरी, सोयाबीन अशा खरीप पिकांची पेरणी केलेली आहे; परंतु पावसाने दडी मारल्यामुळे यातील काही पिके उगवल्यानंतर वाळत आहेत. काही पिके उगवली नसल्यामुळे या पिकांचे बियाणे खराब झाले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काही शेतकऱ्यांनी खरीप पेरणीकरिता घरातील सोने-नाणे बँकांकडे गहाण ठेवून, काहींनी खाजगी सावकारांकडून कर्ज काढून तर काहींनी धान्य विक्रीतून खरीप हंगामासाठी बियाणे खतांची सोय केली. धरणीमातेची ओटी भरली. आता पाऊसच पडत नसल्यामुळे शेतकऱ्यांना काय करावे, हे कळेनासे झाले आहे.यापूर्वी रबी व उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांची गहू, ज्वारी, हरभरा ही पिके मोसंबी, आंबा या फळबागा पाऊस व गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्या आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. यामुळे शेतकरी रबी व खरीप या दोन्ही हंगामात निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी भरडला जात आहे. या भागातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शासन उदासीनया तालुक्यात जर कृत्रिम पाऊस पाडला असता तर शेतकऱ्यांची पेरणी होऊन खरीप पिकांना दिलासा मिळाला असता मात्र कृत्रिम पावसाकरिता शासनच उदासीन राहीले. तसेच या तालुक्यातील पर्जन्यमानाचा विचार करून लोकप्रतिनीधींनीही शासनाकडे कृत्रिम पावसाची मागणी लावून धरली नाही. परिणामी, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई तालुक्यात पाऊस पडत नसल्यामुळे अर्धा पावसाळा झाला तरीही तालुक्यातील नदी, नाले कोरडेच आहेत. तसेच या तालुक्यात असलेले वाल्हा व राजेवाडी येथील साठवण तलाव व सोमठाणा येथील अप्पर दुधना धरण व अनेक कोल्हापुरी बंधारे अद्यापही कोरडेच आहेत. यामुुळे या तालुक्यातील पाणीपातळी वाढली नाही. अनेक गावांतील विहिरी व हातपंप कोरडे झाले आहेत. परिणामी, अनेक गावांत भर पावसाळ्यात ग्रामस्थांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.सध्या या तालुक्यातील नानेगाव, कुसळी,कडेगाव,राजेवाडी व अंतर्गत दोन वाडया, मांजगाव, वंजारवाडी व अंतर्गत तीन वाड्या, धोपटेश्वर, देवपिंपळगाव, ढोकसाळ या गावांना टँकरने पिण्याचा पाणीपुरवठा सुरू आहे. तसेच तालुक्यातील खडकवाडी, परदेशवाडी, हालदोला, कुंभारी, बदनापूर, पाडळी, मात्रेवाडी,खामगाव, ढासला, पीरवाडी, मालेवाडी, अकोला, भिलपुरी, गोकुळवाडी तांडा आदी गावांना खाजगी विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा केल्या जात आहे. तसेच या तालुक्यातील वाकुळणी,बाजार वाहेगाव, बदनापूर, दूधनवाडी, आसरखेडा, म्हसला-भातखेडा, तळणी-लोधेवाडी, चित्तोडा, आसोला, कंडारी बु,खामगाव, भाकरवाडी, वाघु्रळ, नांदखेडा, जवसगाव, सिरसगाव घाटी, पीरसावंगी, कंडारी खु, डोंगरगाव सा, सोमठाणा आदी गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे येथील पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रस्तावाकरिता शिफारस केली आहे.