शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाणीटंचाई कृती आराखडा कागदावरच

By admin | Updated: May 31, 2014 00:28 IST

सुनील चौरे, हदगाव तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख १० हजारांचा करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता़

सुनील चौरे, हदगाव तालुक्यासाठी संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा ६५ लाख १० हजारांचा करून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविला होता़ त्यापैकी २९ लाख रुपये निधी मंजूरही झाला असला तरी अद्याप एकाही गावात प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही़ अनेक गावे पाणीटंचाईच्या खाईत असतानाही प्रशासन मात्र पाणीटंचाई नसल्याचे कागदी घोडे नाचविण्यात मग्न आहे़ ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे़ पाणीटंचाई कृती आराखडा दोन टप्प्यात करण्यात येतो़ जानेवारी ते मार्च पहिला टप्पा तर दुसरा टप्पा एप्रिल ते जून असा असतो़ परंतु सध्या मे महिना संपत आला आहे. एकाही गावात सार्वजनिक विहीर नाही़ हातपंप दुरूस्ती नाही़ नवीन हातपंप सुरू केले नाहीत़ पुरक नळयोजना सुरू नाहीत़ यावर्षी पावसाळा चांगला झाला़ त्यामुळे पाणीटंचाई अनेक गावांत नाही़ तालुक्यात कुठेच पाणीटंचाई नाही, तर मग ६५ लाखांचा कृती आराखडा कशासाठी केला? हाही एक प्रश्नच आहे़ नळयोजना विशेष दुरूस्तीसाठी तळणी, मनुला खुर्द, हरडफ, लोहातांडा, आष्टीतांडा, धोतरा, पाथरड, कोळगाव, चिकाळा, पिंपळगाव, कनकेवाडी, माळझरा, बरडशेवाळा या १४ गावांचा समावेश होता़ दुसर्‍या टप्प्यात एप्रिल ते जून नळयोजना विशेष दुरूस्ती पिंपळगाव ४, साप्ती १ येथे होत्या़ नवीन विहीर २४ ठिकाणी अभिप्रेत होत्या़ यामध्ये यळंब, गोर्लेगाव, कोथळा, बाभळी, हाडसणी, बेलमंडळ, गोरफळी २, वायफना १, जगापूर १, कोळी १, शिबदरा २, निमगाव १, चोरंबा (ना), १, खैरगाव १, रोडगी १, बामणी तांडा १, कवाना १, डोरली १, टाकळगाव १, डोंगरगाव १ परंतु एकाही ठिकाणी काम सुरू नाही़ याविषयी पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख ए़ आऱ वडजे यांना विचारपूस केली असता आमच्याकडे मागणी आली नाही़ आमच्या तालुक्यात नजरेत पाणीटंचाई नाही़ १४ गावांत हातपंपासाठी परवानगी मिळाली़ कामाला लवकरच सुरुवात होईल, असे सांगितले़ या १४ गावांमध्ये जांभळसावली, शिबदरा, बोरी, हस्तरा, गुरफळी, गोर्लेागाव, अंबाळा, डिग्रस, राळावाडी, ठाकरवाडी, राजवाडी, येवली, वायफना (खु़), आष्टी, लिंगापूर, धानोरा आदी गावांचा समावेश आहे़ पावसाळा चांगला झाला असला तरी अनेक गावांतील काही भागात भीषण पाणीटंचाई आहे़ नियोजनाअभावी तर काही ठिकाणी दूषित पाण्यामुळे टंचाई आहे़ मनाठा, सावरगाव, बरडशेवाळा, चिंचगव्हाण, निवघा, तामसा आदी ठिकाणी टंचाई आहे़ ग्रामपंचायतने लक्ष घालून प्रस्ताव पंचायत समितीला पाठविणे आवश्यक आहे़ वरिष्ठ अधिकार्‍यांनी त्या गावाला भेट देवून प्रत्यक्ष पाहणी करूनही पाणीटंचाई निवारण करणे गरजेचे आहे़ परंतु असे होताना दिसून येत नाही़ पाऊस समाधानकारक होईपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची गरज आहे़ नवीन विंधन विहिरीसाठी ४२ गावांचा समावेश होता़ यामध्ये तळणी २, उंचेगाव (बु़) १, आमगव्हाण-१, इरापूर १, वाकी १, अंबाळा २, हस्तरा १, बोरगाव १, धानोरा १, भानेगाव १, रूई १, तामसा २, दिग्रस १, हळेगाव १, वारकवाडी २, हळेगाव १, आष्टी १, वाळकी खु़ १, धानोरा १, तळेगाव २, लिंगापूर १, घोगरी २, येवली १, राजवाडी १, तालंग १, करमोडी १, नेवरी १, मरडगा १, चाभरा २, वरवट १, पळसा १, गारगव्हाण १, बामणी २, केदारगुडा १, ल्याहरी १ इत्यादी गावांना ठेंगाच दाखविण्यात आला़ टँकरद्वारे पाणीपुरवठा पहिल्या टप्प्यात २, तामसा २, शेतमजूरवाडी १, मनाठा २ आदी गावांचा समावेश होता़