शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यात ४६ गावांत पाणीटंचाई

By admin | Updated: June 28, 2017 00:41 IST

जालना : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी जिल्ह्यात अद्याप सर्वदूर दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी अनेक गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यातील ३१ गावे व १५ वाड्यांना ३६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा होत आहे.जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाचा जिल्ह्यास यंदा चांगला फायदा झाला. त्यामुळे गतवर्षी उन्हाळ्यात सहाशेवर गेलेली टँकरची संख्या या वर्षी १२५ पर्यंत पोहचली. यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने वेळेवर हजेरी लावली. परंतु बदनापूर, मंठा, परतूर, जालना तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक गावातील शासकीय पाणी पुरवठ्याच्या विहिरी कोरड्या पडल्याने तिथे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे टँकर सुरू करण्यात आलेले आहेत. जालना तालुक्यात ९ गावे व ६ वाड्यांवर, भोकरदन तालुक्यात दहा गावे, दोन वाड्यांवर २१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.जाफराबाद तालुक्यात दोन गावे, परतूरमध्ये एक, मंठ्यात दोन, अंबडमध्ये पाच तर घनसावंगी तालुक्यात नऊ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात ३६ टँकरच्या माध्यमातून ९६ फेऱ्या पूर्ण केल्या जात आहे. अपुऱ्या पावसामुळे आणखी काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा करण्याची शक्यता आहे.