शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

१० नगरपालिकांच्या हद्दीत पाणीटंचाई

By admin | Updated: December 14, 2015 23:59 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात ग्रामीण भागांसह शहरी भागांनाही यंदा हिवाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसत आहे. नगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात ग्रामीण भागांसह शहरी भागांनाही यंदा हिवाळ्यात पाणीटंचाईचा फटका बसत आहे. नगरपालिका क्षेत्रात पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. प्रशासनाने आपत्कालीन पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. १० नगरपालिकांच्या हद्दीत जानेवारी २०१६ अखेर तीव्र पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. विभागातील ५३ नगरपालिकेच्या पाणीटंचाईचा आराखडा नगरपालिका प्रशासन तयार करीत आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा, सोनपेठ, नांदेड जिल्ह्यातील मुदखेडला जानेवारीमध्येच अतितीव्र तर जानेवारीनंतर गंगाखेड, कंधार, हदगाव, बिलोली, कुंडलवाडी, अर्धापूर, उदगीर, कळंब या नगरपालिकांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मार्चनंतर खुलताबाद, वैजापूर, अंबड, मानवत, देगलूर, धारूर, केज, गेवराई, औसा आणि उमरगा या नगरपालिकांना पाणीटंचाईच्या झळा बसणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासन नियोजन करीत आहे. मराठवाड्यात ४५० गावे आणि २०२ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो आहे. मराठवाड्यात यावर्षी कमी पाऊस झाल्यामुळे आगामी काळात तालुक्यांना पाणीपुरवठा कसा करायचा, याबाबत नगरपालिका प्रशासनासमोर नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे.