शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाचा पाणी प्रश्न १२ वर्षांनंतर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. ...

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेकडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु मनपाकडून विमानतळाला पाणी मिळालेच नाही. समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे उत्तर मनपाने दिले; पण अखेर विमानतळाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाणी दिले आहे. त्यामुळे विमानतळावरील पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे.

विमानतळाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज पडते. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात होती. विमानतळावर होणाऱ्या बैठकीतही हा मुद्दा चर्चीला जात असे. गेल्या १२ वर्षांपासून ही मागणी केली जात होती. विभागीय आयुक्तांनीदेखील पाणी देण्याची सूचना केली होती. तरीही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे विमानतळाला पाणी विकत घ्यावे लागत होते. टँकरवरच भिस्त होती. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देता येणार नसल्याचे पत्र विमानतळाला देण्यात आले. शेवटी विमानतळ प्राधिकरणाने ‘एमआयडीसी’कडे पाण्याची मागणी केली. अखेर विमानतळासाठी १०० मि.मी. व्यासाच्या पाणीपुरठ्याचे काम ‘एमआयडीसी’कडून करण्यात आले. याद्वारे आता विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होणार आहे.

आज पाणी पूजन

विमानतळाला ‘एमआयडीसी’मार्फत पाणी मिळाले आहे. विमानतळावरील एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता पाणी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होईल.

- डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ