शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

विमानतळाचा पाणी प्रश्न १२ वर्षांनंतर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. ...

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेकडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु मनपाकडून विमानतळाला पाणी मिळालेच नाही. समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे उत्तर मनपाने दिले; पण अखेर विमानतळाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाणी दिले आहे. त्यामुळे विमानतळावरील पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे.

विमानतळाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज पडते. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात होती. विमानतळावर होणाऱ्या बैठकीतही हा मुद्दा चर्चीला जात असे. गेल्या १२ वर्षांपासून ही मागणी केली जात होती. विभागीय आयुक्तांनीदेखील पाणी देण्याची सूचना केली होती. तरीही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे विमानतळाला पाणी विकत घ्यावे लागत होते. टँकरवरच भिस्त होती. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देता येणार नसल्याचे पत्र विमानतळाला देण्यात आले. शेवटी विमानतळ प्राधिकरणाने ‘एमआयडीसी’कडे पाण्याची मागणी केली. अखेर विमानतळासाठी १०० मि.मी. व्यासाच्या पाणीपुरठ्याचे काम ‘एमआयडीसी’कडून करण्यात आले. याद्वारे आता विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होणार आहे.

आज पाणी पूजन

विमानतळाला ‘एमआयडीसी’मार्फत पाणी मिळाले आहे. विमानतळावरील एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता पाणी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होईल.

- डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ