शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

विमानतळाचा पाणी प्रश्न १२ वर्षांनंतर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:02 IST

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. ...

औरंगाबाद : शहराच्या वाहतूक क्षेत्राला भरभराटी देणाऱ्या चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाला गेल्या १२ वर्षांपासून पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. विमानतळ प्राधिकरणाने महापालिकेकडे ४ इंच जलवाहिनी जोडणीची मागणी केली; परंतु मनपाकडून विमानतळाला पाणी मिळालेच नाही. समांतर जलवाहिनीनंतरच पाणी देणे शक्य असल्याचे उत्तर मनपाने दिले; पण अखेर विमानतळाला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पाणी दिले आहे. त्यामुळे विमानतळावरील पाण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे.

विमानतळाला मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज पडते. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने वारंवार महापालिकेकडे ४ इंची जलवाहिनीची जोडणी देण्याची मागणी केली जात होती. विमानतळावर होणाऱ्या बैठकीतही हा मुद्दा चर्चीला जात असे. गेल्या १२ वर्षांपासून ही मागणी केली जात होती. विभागीय आयुक्तांनीदेखील पाणी देण्याची सूचना केली होती. तरीही पाण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे विमानतळाला पाणी विकत घ्यावे लागत होते. टँकरवरच भिस्त होती. त्यातून अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते; परंतु समांतर जलवाहिनी झाल्याशिवाय पाणी देता येणार नसल्याचे पत्र विमानतळाला देण्यात आले. शेवटी विमानतळ प्राधिकरणाने ‘एमआयडीसी’कडे पाण्याची मागणी केली. अखेर विमानतळासाठी १०० मि.मी. व्यासाच्या पाणीपुरठ्याचे काम ‘एमआयडीसी’कडून करण्यात आले. याद्वारे आता विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होणार आहे.

आज पाणी पूजन

विमानतळाला ‘एमआयडीसी’मार्फत पाणी मिळाले आहे. विमानतळावरील एटीएस कॉम्प्लेक्स परिसरात गुरुवारी सकाळी ११.३० वाजता पाणी पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विमानतळाला रोज १.७ लाख लिटर पाणीपुरवठा होईल.

- डी. जी. साळवे, संचालक, विमानतळ