शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपातळी खालावली

By admin | Updated: April 8, 2017 21:37 IST

गढीएप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे.

विष्णू गायकवाड  गढीएप्रिल महिन्याच्या पूर्वार्धातच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील साठाही दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे पाण्याची तीव्र समस्या निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहे. पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये आतापासूनच पाण्याची समस्या बिकट होण्याची भीती निर्माण झाली आहे. बहुतांश विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली असून, त्या कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अनेक गावांतील हातपंपातून पाणी येत नाही. नद्या-नाले कोरडे पडल्यामुळे पाण्याची समस्या अधिकच बिकट होणार आहे. पाणीसाठे संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत असल्यामुळे ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण रूप धारण करणार आहे. पाणी समस्या निवारण्यासाठी शासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात येत असले तरी बऱ्याच ठिकाणी आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, असा प्रश्न आहे. वाढते तापमान आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून, जलाशयातील पाण्याचा साठा संपुष्टात येत आहे. एकीकडे उन्हाची तीव्र दाहकता, तर दुसरीकडे पाण्याची टंचाई आणि जनावरांसाठी वैरण नसल्याने शेतकरी आपली जनावरे विकत आहेत.शेतकऱ्यांजवळ जनावरांना पिण्यासाठी पाणी व वैरण नाही त्यामुळे जनावरांना द्यावे तरी काय, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.खरीप हंगामात शेतीच्या लागवडीसाठी लागणाऱ्या बी-बियाणे खरेदीला पैसे नाहीत. त्यातच ही समस्या निर्माण झाल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. आतापासूनच पाणी टंचाईचे चटके सोसावे लागत असले तरी प्रशासन मात्र अजूनही सुस्त आहे.