शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

पाणीपातळी वाढू लागली

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

पैठण : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी दि. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात दाखल झाले.

पैठण : नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे पाणी दि. ३१ जुलैच्या मध्यरात्रीपासून जायकवाडी धरणात दाखल झाले. आज दुपारी ४ वाजेपर्यंत धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाने वाढ झाली आहे. सध्या धरणात १४,७७४ क्युसेक्स क्षमतेने पाण्याची आवक सुरू आहे.नाशिक व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत पावसाचा जोर कमी झाल्याने जायकवाडीत येणाऱ्या पाण्यात घट होण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातील कनिष्ठ अभियंता अशोक नरुटे यांनी व्यक्त केली आहे. जायकवाडीत पाण्याची आवक सुरू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.जायकवाडी धरणाचे बंदिस्त पाणलोट क्षेत्र असलेल्या नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणे प्रचलन आराखड्यानुसार निश्चित केलेल्या टक्केवारीपेक्षा जास्त भरली आहेत. आजच्या तारखेला धरणात किती पाणीसाठा करता येतो, हे प्रचलन आराखड्यानुसार गोदावरी खोऱ्यातील सर्व धरणांना ठरवून दिले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून ८६४९ क्युसेक्स, गंगापूर धरणातून १०४१ क्युसेक्स असा विसर्ग करण्यात येत असून, हा एकत्रित विसर्ग नांदूर-मधमेश्वर वेअरमधून ९६८४ क्युसेक्स गोदावरी पात्रात होत आहे.नांदूर-मधमेश्वर वेअरमधून सुटलेले पाणी १५४ कि.मी. प्रवास करीत २६ तासांनंतर जायकवाडीत दाखल झाले. सुरुवातीला या पाण्याची आवक अत्यंत कमी होती; मात्र रात्री ११ वाजेनंतर वाढ होत गेल्याने ४४,००० क्युसेक्स क्षमतेने रात्री १ वाजेनंतर धरणात आवक होत होती. गेल्या २४ तासांत जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक- ३० मि.मी., गंगापूर- ५० मि.मी., भंडारदरा- ३४ मि.मी. निळवंडे- ३७ मि.मी. व कोतुळ- ३४ मि.मी. एवढीच पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणात पाण्याची आवक घटण्याची शक्यता धरण नियंत्रण कक्षातील आर.ई. चक्रे यांनी व्यक्त केली आहे.१५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची पाणीपातळी दि. ३१ जुलै रोजी १४९५.१८ फूट एवढी होती. ती शुक्रवार, दि. १ आॅगस्ट रोजी दुपारी १४९६.६२ फुटापर्यंत वाढली आहे. जवळपास धरणाच्या पाणी पातळीत दीड फुटाने वाढ झाली असून, दि. ३१ जुलै रोजी धरणातील जलसाठा १.४४ टक्के एवढा होता. तो ४.७७ टक्के एवढा झाला आहे. सध्या धरणाची पाणीपातळी १४९६.६२ फूट व ४५६.१७० मीटरमध्ये आहे. धरणात पाणी दाखल झाल्याने एकूण जलसाठा ८४१.६७४ द.ल.घ.मी. जिवंत साठा झाला आहे. (वार्ताहर)जिवंत साठ्यात वाढदि. ३१ जुलै रोजी धरणात ३१.३७८ द.ल.घ.मी. म्हणजे १.१० टी.एम.सी. (१ टी.एम.सी. दशांश दहा) एवढा जलसाठा होता. हा उपयुक्त जलसाठा आज रोजी १०३.६७४ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. म्हणजेच धरणात ३.६३ टी.एम.सी. जलसाठा झाला असून, उपयुक्त जलसाठ्यात २.५३ टी.एम.सी.ने वाढ झाली आहे. वाढलेल्या उपयुक्त जलसाठ्यामुळे धरणातून पिण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱ्या सर्व योजनांना दिलासा मिळाला आहे.प्रचलन आराखडा डावलून केला जलसाठाप्रचलन आराखड्यानुसार जायकवाडी धरणात १ आॅगस्ट रोजी ८८.७८ टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा करता येत नाही. यापेक्षा जास्त जलसाठा झाल्यास धरणातून विसर्ग करावा लागतो. राज्य शासनाने ठरवून दिलेला प्रचलन आराखडा डावलून नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणात १ आॅगस्ट २०१४ रोजी जास्तीचा जलसाठा करण्यात आला आहे. वरील धरणात साठविण्यात आलेले पाणी हे जायकवाडीच्या हक्काचे आहे. त्यामुळे बेकायदेशीररीत्या अडविलेले पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.जायकवाडीवरील धरणातील जलसाठाजायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वरील धरणात आज रोजी पुढीलप्रमाणे जलसाठा झाला आहे. यात करंजवन धरण- ४३.५० टक्के, गंगापूर धरण ८०.१७ टक्के, दारणा धरण- ७६.७८ टक्के, भंडारदरा धरण- ६१.४१ टक्के, ओझरखेड १९.४१ टक्के, पालखेड धरण- ९४.७१ टक्के व मुळा धरण- ३४.८१ टक्के.