शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’ला घरघर

By admin | Updated: May 12, 2017 23:33 IST

बीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही.

राजेश खराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक कामे प्रक्रियेतच रखडली आहेत. गतवर्षी मे अखेरीस पहिला टप्पा पूर्ण झाला होता. मात्र, यंदा २३६९ कामांपैकी केवळ दोन हजार कामे पूर्ण झाली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलसंधारणाच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरिता २५६ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी २७१ गावांमध्ये दर्जात्मक कामे झाली होती. शिवाय, समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याचे चित्र पलटले होते. मात्र, जलसंधारणाचे गांभीर्य संबंधित विभागांना राहिले नसल्याने कामे कासवगतीने सुरू आहेत. प्रगतीपथावरील कामांची आकडेवारी दाखवून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून धूळफेक केली जात आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या तोडीस जलसंधारणाकरिता सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, नाम फाऊंडेशनची कामे प्रगतीपथावर असून, यामध्ये लोकसहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम जलयुक्त शिवार अभियानावरही झाला असल्याचे दिसून येत आहे.परळी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून, उप विभागीय, जिल्हाधिकारी समिती व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवायच सहायक पर्यवेक्षक स्तरावरच कामांना मंजुरी दिली जात असल्याने अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे प्रस्तावाबाबतची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाकडे नसल्याने अवमेळ होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या अभियानावर लक्ष केंद्रित करून पहिला टप्पा यशस्वी केला होता. दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात होताच जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे समीकरण सुरू झाल्याने मूळ कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नूतन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या अनुषंगाने मंगळवारी आढावा बैठक ठेवली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात कामे झाले नाहीत त्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.