शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

‘जलयुक्त’ला घरघर

By admin | Updated: May 12, 2017 23:33 IST

बीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही.

राजेश खराडे ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामांची डेडलाईन तोंडावर आली असताना अनेक ठिकाणी कामांना प्रारंभच झालेला नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अनेक कामे प्रक्रियेतच रखडली आहेत. गतवर्षी मे अखेरीस पहिला टप्पा पूर्ण झाला होता. मात्र, यंदा २३६९ कामांपैकी केवळ दोन हजार कामे पूर्ण झाली आहेत.जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील यशानंतर जलसंधारणाच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरिता २५६ गावांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या वर्षी २७१ गावांमध्ये दर्जात्मक कामे झाली होती. शिवाय, समाधानकारक पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्याचे चित्र पलटले होते. मात्र, जलसंधारणाचे गांभीर्य संबंधित विभागांना राहिले नसल्याने कामे कासवगतीने सुरू आहेत. प्रगतीपथावरील कामांची आकडेवारी दाखवून तालुकास्तरीय अधिकाऱ्यांकडून धूळफेक केली जात आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या तोडीस जलसंधारणाकरिता सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा, नाम फाऊंडेशनची कामे प्रगतीपथावर असून, यामध्ये लोकसहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम जलयुक्त शिवार अभियानावरही झाला असल्याचे दिसून येत आहे.परळी, अंबाजोगाई या तालुक्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढला असून, उप विभागीय, जिल्हाधिकारी समिती व जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवायच सहायक पर्यवेक्षक स्तरावरच कामांना मंजुरी दिली जात असल्याने अनियमितता दिसून येत आहे. त्यामुळे प्रस्तावाबाबतची आकडेवारी वरिष्ठ कार्यालयाकडे नसल्याने अवमेळ होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या अभियानावर लक्ष केंद्रित करून पहिला टप्पा यशस्वी केला होता. दुसऱ्या टप्प्यातील कामांना सुरूवात होताच जिल्हाधिकाऱ्यांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे समीकरण सुरू झाल्याने मूळ कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. नूतन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांनी जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या अनुषंगाने मंगळवारी आढावा बैठक ठेवली आहे. त्यामुळे ज्या तालुक्यात कामे झाले नाहीत त्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे.