शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

पाणी गेले खोलच खोल...!

By admin | Updated: April 6, 2016 01:25 IST

औरंगाबाद : जिल्ह्याचे तापमान जसे वाढू लागले आहे, तसा त्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो आहे.

औरंगाबाद : जिल्ह्याचे तापमान जसे वाढू लागले आहे, तसा त्याचा परिणाम भूजल पातळीवर होतो आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा एप्रिलच्या सुरुवातीस सर्वाधिक भूजल पातळी खोलवर गेल्याची माहिती पुढे आली आहे. पाच वर्षांत दरवर्षी सुमारे १० मीटर या प्रमाणात पाणीपातळी खाली जात आहे. ही बाब गंभीर असल्यामुळे त्याचा परिणाम आगामी काळात जलसंकट घेऊन येण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे कार्यालय आहे. कार्यालयात मनुष्यबळ कमी असल्यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांकडून भूजल सर्वेक्षणाचे काम पूर्ण करून घेतले जात आहे. यंत्रणेने तयार केलेल्या अहवालानुसार भूजल खोलवर जात असल्याचे अनुमान लावणे शक्य आहे. परंतु कोणत्या भागात किती पाणी आहे, याचा निश्चित अंदाज लावणे यंत्रणेला शक्य नाही, अशी खंत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जमिनीच्या पृष्ठभागापासून खाली खोल १५० ते २०० फुटांपर्यंत पाणीपातळी गेली आहे. ते उपसण्यासाठीदेखील नागरिक मागे पुढे पाहत नाहीत. केरळ आणि तामिळनाडूतील ‘रॉकब्रेक’ करणाऱ्या बोअरवेल्सच्या ट्रकने शहर व जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. भूजल पातळी खोलवर जात असताना विंधन विहिरी घेण्याचा सपाटा सुरू आहे. हातपंप, विंधन विहिरी खोदण्यावर शासनाने निर्बंध आणले आहेत; परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि शासनाकडून मार्गदर्शन होत नसल्यामुळे जिल्ह्यात भूजलावर डाका टाकण्याचे काम जोरात सुरू आहे.