शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
2
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
3
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
4
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
5
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
6
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
7
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
9
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
10
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
11
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
12
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
13
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
14
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
15
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
16
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
17
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
18
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
19
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
20
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?

वॉटर ग्रीड योजना

By admin | Updated: October 11, 2016 00:49 IST

बीड : आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यात जलसंधारणाची शाश्वत कामे झाली नाही. त्यामुळे जनतेला मोठ्या कष्टांचा सामना करावा लागला.

बीड : आघाडी सरकारच्या काळात मराठवाड्यात जलसंधारणाची शाश्वत कामे झाली नाही. त्यामुळे जनतेला मोठ्या कष्टांचा सामना करावा लागला. आमच्या सरकारने दुष्काळ हटविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. येत्या काळात वॉटर ग्रीड योजना मराठवाडाभर राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.येथे सीना-मेहकरी उपसा जलसिंचन योजनेचा लोकार्पण सोहळा सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, आ. भीमराव धोंडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आ. साहेबराव दरेकर, बाळासाहेब आजबे, सतीश शिंदे, राम खाडे यांची उपस्थिती होती.फडणवीस म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉटर ग्रीड योजना राबवून नंदनवन केले होते. याच धर्तीवर आता मराठवाड्यात पिण्याच्या पाण्याबरोबर शेती व उद्योगांसाठी या योजनेच्या माध्यमातून योग्य ते नियोजन केले जाणार आहे. मराठवाड्यातील रस्ते व पाण्यासाठी ४९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. यातून विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पालकमंत्री मुंडे, मंत्री शिंदे, शिवतारे यांची भाषणे झाली. आ. धोंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)