शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

गोदाकाठच्या गावांचा मिटला पाणी प्रश्न

By admin | Updated: September 3, 2014 01:11 IST

गंगामसला : बीड-परभणी या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील ढालेगाव येथील गोदावरी नदीवर असलेला बंधारा १०० टक्के भरला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या १५ गावांना याचा फायदा होणार असून

गंगामसला : बीड-परभणी या दोन जिल्ह्यांच्या सीमारेषेवरील ढालेगाव येथील गोदावरी नदीवर असलेला बंधारा १०० टक्के भरला आहे. त्यामुळे गोदाकाठच्या १५ गावांना याचा फायदा होणार असून, त्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे. बंधाऱ्यात पाणी आल्याने हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.यावर्षी पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले होते तरीही जोरदार पाऊस झाला नव्हता. यामुळे बंधाऱ्याची पाणीपातळी तळाला जाऊन बंधारा कोरडा पडण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने हा बंधारा तुडुंब भरला आहे. या बंधाऱ्यात १४.८७ दलघमी एवढा पाणीसाठा आहे. या बंधाऱ्यामुळे २ हजार २४१ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. त्यामध्ये पाथरी तालुक्यातील ११३५ तर माजलगाव तालुक्यातील ११०६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.या बंधाऱ्यातील पाण्याचा माजलगाव तालुक्यातील मंजरथ, आळसेवाडी, बोरगाव, आबेगाव, साखर पिंपळगाव, सोमठाणा, आडोळा या गावांना फायदा होणार आहे तर पाथरी तालुक्यातील निवडी पाटोदा, मंडसगाव, गोपेगाव, बाणेगाव, वडी, रामपुरी, ढालेगाव या गावांबरोबर पाथरी तालुक्यालाही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याच बंधाऱ्यातून ैहोणार आहे. तसेच मत्स्य व्यवसायही वाढणार आहे. मोठीवाडी व गंगामसला या गावांना येथून पाणीपुरवठा होतो यामुळे या गावांचा सुद्धा पाण्याचा प्रश्न मिटला आहे.सध्या बंधाऱ्यामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. याबाबत पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही.आर. ठोंबरे म्हणाले, आणखी बंधाऱ्याचे काम पूर्ण झालेले नाही, उर्वरित काम तात्काळ पूर्ण करण्यात येईल. बंधाऱ्याच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. (वार्ताहर)