शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

देवगिरीनगरात पाणी, ड्रेनेजचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:10 IST

सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. वारंवार अर्ज, विनंत्या करुनही प्रशासन नागरी सुविधा पुरवित नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

सिडको प्रशासनाने दोन दशकांपूर्वी मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वतंत्र योजना राबवून घराचे वाटप केले. देवगिरीनगरात लोकसंख्या कमी असल्याने सुरुवातीच्या काळात नागरी समस्या निर्माण झाल्या नाहीत. मात्र, लोकसंख्या वाढल्यानंतर सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने मुख्य रस्ते डांबरीकरण केले. त्यामुळे रस्त्याचा प्र्रश्न मार्गी लागला आहे. पण पाणी, ड्रेनेज आणि लाईटची समस्या अजूनही कायम आहे. पाणीप्रश्न तर गंभीर झाला आहे. या भागाला आठवड्यातून दोनवेळा तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची तारांबळ उडते. या भागातील हातपंपही बंद आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत असून विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. ड्रेनेजलाईन जीर्ण झाली असून पाईपही कमी व्यासाचे आहेत. ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ड्रेनेजचे चेंबर सारखे तुंबते. घाण पाणी घरासमोरच साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी त्रास सहन करावा लागत आहे. येथून वाहनाºया नैसर्गिक नाल्याचीही वेळेवर साफसफाई केली जात नाही. नाला उघडा असल्याने व घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. घाणीमुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे पाच-सहा महिन्यापासून बंद आहेत. काही खांबावर तर दिवेच नाहीत. रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होत असून महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

येथील मोकळ्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी व बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील बंद पडलेली पोलीस चौकी टवाळखोरांचा अड्डा बनली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर येथेचे दारु पित असून उशिरापर्यंत गोंधळ घालत बसतात. टवाळखोराच्या उपद्रवामुळे लगतचे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही.

त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप येथील छाया कुकलारे, सरस्वती थापा, कविता हंडोरे, अंजली परडकर, गयाबाई वाघ, एस.बी. राजपूत, चतुराबाई कुंभार, रेखा नाईकवाडे, गीता म्हस्के, कविता खेळवणे, प्रिया देशमुख, अनिता शेरे, सोनाली नानोरकर, शांताबाई सुतार, मनिषा ताठे, प्रतिभा निकते, राजू मोरे, नागेश कुकलारे आदी नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Walujवाळूज