शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

देवगिरीनगरात पाणी, ड्रेनेजचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:10 IST

सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. वारंवार अर्ज, विनंत्या करुनही प्रशासन नागरी सुविधा पुरवित नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

सिडको प्रशासनाने दोन दशकांपूर्वी मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वतंत्र योजना राबवून घराचे वाटप केले. देवगिरीनगरात लोकसंख्या कमी असल्याने सुरुवातीच्या काळात नागरी समस्या निर्माण झाल्या नाहीत. मात्र, लोकसंख्या वाढल्यानंतर सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने मुख्य रस्ते डांबरीकरण केले. त्यामुळे रस्त्याचा प्र्रश्न मार्गी लागला आहे. पण पाणी, ड्रेनेज आणि लाईटची समस्या अजूनही कायम आहे. पाणीप्रश्न तर गंभीर झाला आहे. या भागाला आठवड्यातून दोनवेळा तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची तारांबळ उडते. या भागातील हातपंपही बंद आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत असून विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. ड्रेनेजलाईन जीर्ण झाली असून पाईपही कमी व्यासाचे आहेत. ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ड्रेनेजचे चेंबर सारखे तुंबते. घाण पाणी घरासमोरच साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी त्रास सहन करावा लागत आहे. येथून वाहनाºया नैसर्गिक नाल्याचीही वेळेवर साफसफाई केली जात नाही. नाला उघडा असल्याने व घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. घाणीमुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे पाच-सहा महिन्यापासून बंद आहेत. काही खांबावर तर दिवेच नाहीत. रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होत असून महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

येथील मोकळ्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी व बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील बंद पडलेली पोलीस चौकी टवाळखोरांचा अड्डा बनली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर येथेचे दारु पित असून उशिरापर्यंत गोंधळ घालत बसतात. टवाळखोराच्या उपद्रवामुळे लगतचे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही.

त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप येथील छाया कुकलारे, सरस्वती थापा, कविता हंडोरे, अंजली परडकर, गयाबाई वाघ, एस.बी. राजपूत, चतुराबाई कुंभार, रेखा नाईकवाडे, गीता म्हस्के, कविता खेळवणे, प्रिया देशमुख, अनिता शेरे, सोनाली नानोरकर, शांताबाई सुतार, मनिषा ताठे, प्रतिभा निकते, राजू मोरे, नागेश कुकलारे आदी नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Walujवाळूज