शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

देवगिरीनगरात पाणी, ड्रेनेजचा प्रश्न गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 23:10 IST

सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे.

वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील देवगिरी नगरात पाणी व ड्रेनेजच्या प्रश्नाने गंभीर रुप धारण केले आहे. वारंवार अर्ज, विनंत्या करुनही प्रशासन नागरी सुविधा पुरवित नसल्याने रहिवाशांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. संबंधित विभागाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

सिडको प्रशासनाने दोन दशकांपूर्वी मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी स्वतंत्र योजना राबवून घराचे वाटप केले. देवगिरीनगरात लोकसंख्या कमी असल्याने सुरुवातीच्या काळात नागरी समस्या निर्माण झाल्या नाहीत. मात्र, लोकसंख्या वाढल्यानंतर सुविधा अपुऱ्या पडू लागल्या. काही दिवसांपूर्वी प्रशासनाने मुख्य रस्ते डांबरीकरण केले. त्यामुळे रस्त्याचा प्र्रश्न मार्गी लागला आहे. पण पाणी, ड्रेनेज आणि लाईटची समस्या अजूनही कायम आहे. पाणीप्रश्न तर गंभीर झाला आहे. या भागाला आठवड्यातून दोनवेळा तेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यातही पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांची तारांबळ उडते. या भागातील हातपंपही बंद आहेत. पुरेसे पाणी मिळत नसल्याने रहिवाशांचे पाण्यासाठी हाल होत असून विकतच्या पाण्याचा आधार घ्यावा लागत आहे. ड्रेनेजलाईन जीर्ण झाली असून पाईपही कमी व्यासाचे आहेत. ड्रेनेज व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने ड्रेनेजचे चेंबर सारखे तुंबते. घाण पाणी घरासमोरच साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी त्रास सहन करावा लागत आहे. येथून वाहनाºया नैसर्गिक नाल्याचीही वेळेवर साफसफाई केली जात नाही. नाला उघडा असल्याने व घाण साचल्याने परिसरात दुर्गंधी व डासाचा फैलाव वाढला आहे. घाणीमुळे साथीचे आजार जडत असल्याने नागरिकांना आरोग्य विषयक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मुख्य व अंतर्गत रस्त्यावरील पथदिवे पाच-सहा महिन्यापासून बंद आहेत. काही खांबावर तर दिवेच नाहीत. रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांची गैरसोय होत असून महिला व लहान मुलांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे.

येथील मोकळ्या जागेचा वापर वाहने उभी करण्यासाठी व बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी केला जात असल्याने लहान मुलांना रस्त्यावर खेळावे लागत आहे. विशेष म्हणजे येथील बंद पडलेली पोलीस चौकी टवाळखोरांचा अड्डा बनली आहे. रात्रीच्या वेळी टवाळखोर येथेचे दारु पित असून उशिरापर्यंत गोंधळ घालत बसतात. टवाळखोराच्या उपद्रवामुळे लगतचे रहिवाशी त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही.

त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोप येथील छाया कुकलारे, सरस्वती थापा, कविता हंडोरे, अंजली परडकर, गयाबाई वाघ, एस.बी. राजपूत, चतुराबाई कुंभार, रेखा नाईकवाडे, गीता म्हस्के, कविता खेळवणे, प्रिया देशमुख, अनिता शेरे, सोनाली नानोरकर, शांताबाई सुतार, मनिषा ताठे, प्रतिभा निकते, राजू मोरे, नागेश कुकलारे आदी नागरिकांनी केला आहे.

टॅग्स :Walujवाळूज