शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
3
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
4
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
5
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
6
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
7
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
8
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
9
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
10
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
11
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
12
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
13
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
14
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?
15
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
16
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
17
CBSE Board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
18
Video: निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
19
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
20
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?

७० गावांवर पाणी संकट घोंगावतय

By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST

बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे.

बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे. आज स्थितीतही बीड तालुक्यात ७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या सर्व ठिकाणी प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे.पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील पावसाचा पत्ता नाही. हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तर डोळ्यातच पाणी आले आहे. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैलची पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात ७७ हजार ७२० नागरिकांना सध्या जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. यामध्ये ५३ गावांची तर १७ वाड्यांची संख्या आहे. तालुक्यात एकूण शासकीय टँकर चार आहेत. तर खाजगी ४३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे हे संकट ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याचेही पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी तर स्थानिक राजकारणांमुळे योजना रखडलेल्या आहेत. ३० विहिरींचे अधिग्रहणपिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याने प्रशासनाने तालुक्यात ३० विहिरी व ३५ बोअर अधिग्रहित केले आहेत. यामुळे काही गावांचा पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला आहे. मात्र पाण्याचे उद्भव आटत चालले असल्याचे बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात पहावयास मिळत आहे. उद्भव आटले तरी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणायचे कोठून हा प्रश्न नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या समोरही उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बीड तालुक्यातील चौसाळा येथे भेट देून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये नागरिकांनी सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याची समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. यावरून येथील पाणी पुरवठ्याची यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. भविष्यात आवश्यकता भासल्यास ज्या विहिरींना पाणी आहे त्या विहिरी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)