शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

७० गावांवर पाणी संकट घोंगावतय

By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST

बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे.

बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे. आज स्थितीतही बीड तालुक्यात ७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या सर्व ठिकाणी प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे.पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील पावसाचा पत्ता नाही. हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तर डोळ्यातच पाणी आले आहे. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैलची पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात ७७ हजार ७२० नागरिकांना सध्या जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. यामध्ये ५३ गावांची तर १७ वाड्यांची संख्या आहे. तालुक्यात एकूण शासकीय टँकर चार आहेत. तर खाजगी ४३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे हे संकट ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याचेही पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी तर स्थानिक राजकारणांमुळे योजना रखडलेल्या आहेत. ३० विहिरींचे अधिग्रहणपिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याने प्रशासनाने तालुक्यात ३० विहिरी व ३५ बोअर अधिग्रहित केले आहेत. यामुळे काही गावांचा पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला आहे. मात्र पाण्याचे उद्भव आटत चालले असल्याचे बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात पहावयास मिळत आहे. उद्भव आटले तरी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणायचे कोठून हा प्रश्न नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या समोरही उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बीड तालुक्यातील चौसाळा येथे भेट देून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये नागरिकांनी सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याची समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. यावरून येथील पाणी पुरवठ्याची यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. भविष्यात आवश्यकता भासल्यास ज्या विहिरींना पाणी आहे त्या विहिरी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)