शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

७० गावांवर पाणी संकट घोंगावतय

By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST

बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे.

बीड: जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. २०१२ च्या दुष्काळात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना केला आहे. आज स्थितीतही बीड तालुक्यात ७० गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. या सर्व ठिकाणी प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे.पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी देखील पावसाचा पत्ता नाही. हुलकावणी दिलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तर डोळ्यातच पाणी आले आहे. अनेक गावांमध्ये हंडाभर पाण्यासाठी मैलो न मैलची पायपीट करावी लागत आहे. तालुक्यात ७७ हजार ७२० नागरिकांना सध्या जिल्हा प्रशासन टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. यामध्ये ५३ गावांची तर १७ वाड्यांची संख्या आहे. तालुक्यात एकूण शासकीय टँकर चार आहेत. तर खाजगी ४३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीटंचाईचे हे संकट ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरत आहे. अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्याचेही पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी तर स्थानिक राजकारणांमुळे योजना रखडलेल्या आहेत. ३० विहिरींचे अधिग्रहणपिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होत असल्याने प्रशासनाने तालुक्यात ३० विहिरी व ३५ बोअर अधिग्रहित केले आहेत. यामुळे काही गावांचा पाण्याचा प्रश्न तात्पुरत्या स्वरूपात मिटला आहे. मात्र पाण्याचे उद्भव आटत चालले असल्याचे बीड तालुक्यातील चौसाळा परिसरात पहावयास मिळत आहे. उद्भव आटले तरी नागरिकांसाठी पिण्याचे पाणी आणायचे कोठून हा प्रश्न नागरिकांबरोबरच प्रशासनाच्या समोरही उभा ठाकला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बीड तालुक्यातील चौसाळा येथे भेट देून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये नागरिकांनी सर्वात प्रथम पिण्याच्या पाण्याची समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. यावरून येथील पाणी पुरवठ्याची यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. भविष्यात आवश्यकता भासल्यास ज्या विहिरींना पाणी आहे त्या विहिरी ताब्यात घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. (प्रतिनिधी)