शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

जालनेकरांना दूषित पाणी

By admin | Updated: August 17, 2014 00:23 IST

जालना: जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेवर १९३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जालनेकरांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.

जालना: जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेवर १९३ कोटी १६ लाख रुपयांचा खर्च होऊन सुद्धा जालनेकरांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.गेल्या दोन वर्षापूर्वी जालनेकर पाणीटंचाईने त्रासले होते. त्यावेळी जायकवाडी- जालना या पाणीपुरवठा योजनेनेच उन्हाळ्या अखेर का असेना शहरवासियांना दिलासा दिला. गेल्यावर्षी बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे टंचाई जाणवली नाही. याही वर्षीच्या उन्हाळ्यात गेल्या दोन वर्षापूर्वीच्या कटू आठवणी जाणवल्या नाहीत. त्याचे कारण म्हणजे जायकवाडी- जालना योजनाच होय. आलीकडे जालनेकरांना दिवसेंदिवस दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. त्याचे कारण म्हणजे ठिक ठिकाणी जलवाहिन्या मोठ्या प्रमाणात फुटल्या आहेत. मुळात नव्या व जुन्या जालन्यातील वसाहतीतील जलवाहिन्या या निझामकालीन आहेत. त्या जलवाहिन्या आता काही ठिकाणी जीर्ण अवस्थेत आल्या आहेत. परिणामी पाण्याचा दाब सहन करु शकत नाही. त्यामुळे जलवाहिन्या फुटत आहेत. त्याद्वारे हजारो लिटर पाण्याचा अपव्यय तर होतो आहेच शिवाय परंतु रस्त्यांसह नाल्यांमधील घाण, साचलेल्या पाण्यामुळेच जलवाहिनीतून काही वसाहतींना सर्रास दूषित पाण्याचा पुरवठा होतो आहे. काही भागात पिवळसर असे पाणी नळांद्वारे येत असून, काही भागात पाण्यास दुर्गंधी येते आहे. या संदर्भात वसाहतींमधून मोठ्या प्रमाणात ओरड सुरु झाली आहे. पाणी भरल्या व साठविल्याशिवाय पर्याय नाही, परंतु हे दूषित पाणी पिण्यासाठी वापरावे लागत आहे. काही नागरिकांनी पाणी उकळून त्याचा वापर सुरु केला. तर काही ठिकाणी तेच पाणी पिण्यास वापरले जात आहे. ( प्रतिनिधी)१९३ कोटी १७ लाख रुपयांचा या योजनेवर खर्च झाला. परंतु एवढा मोठा खर्च होऊन सुद्धा सद्य स्थितीत शहरवासियांना शुद्ध पाणीपुरवठा होत नाही. पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे पुनरुर्जीवन करणे गरजेचे आहे. एका केंद्रातील जलशुद्धीकरणाचे काम ठप्पच आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेस १५ कोटी ४४ लाख रुपयांची गरज असल्याची माहिती मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.४प्रशासनाने जलवाहिन्यांची दुरुस्तीची कामे पूर्ण करावीत, पाण्याचा अपव्यय थांबवावा शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जगदीश नंद, संतोष गाढे यांनी केली.