शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

जलप्रकल्पांंतील जलसाठ्यांत झपाट्याने घट

By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST

जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे.

जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी पातळीत पन्नास टक्क्यांच्या आत आहे. बहुतांश प्रकल्पांतून अवैध पाणी उपसा होत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांत अवघा ५ टक्के जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्यांनी हा साठा कमी आहे. गतवर्षी दोन्ही प्रकल्प मिळून १५ टक्के पाणी आहे. सातपैकी १ जोत्याच्या पातळीखाली तर लघु प्रकल्पांपैकी ७ कोरडेठाक तर ३१ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. एकही प्रकल्प ओव्हरफ्लो नाही. मध्यम प्रकल्पांपैकी ० ते २५ टक्के पाणीसाठा असणारे दोन, २६ ते ५० टक्क्यांमध्ये २ तर एका प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के जलसाठा आहे. ७६ ते १०० टक्के पाणीसाठा फक्त एका प्रकल्पांत आहे. लघु प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत ० ते २५ टक्के एवढा जलसाठा आहे. ५ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के जलसाठा आहे. एका प्रकल्पात ७६ ते १०० टक्के पाणी आहे. एकूणच प्रकल्पांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.ग्रामीण भागात काही ठिकाणी आत्तापासूनच टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. टँकर तसेच विहिरी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहे.जलसाठ्यात पाणी नसल्याने विहिरी व कूपनलीकांतील पाणी संपूर्ण उन्हाळा पुरेल अशी चिन्हे नाहीत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. (प्रतिनिधी)