शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

जलप्रकल्पांंतील जलसाठ्यांत झपाट्याने घट

By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST

जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे.

जालना : अत्यल्प पर्जन्यमानामुळे जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली नाही. यामुळे यंदा पुन्हा जिल्ह्यावर तीव्र जलसंकट ओढावण्याची भीती व्यक्त होत आहे. मध्यम व लघु प्रकल्पांतील पाणी पातळीत पन्नास टक्क्यांच्या आत आहे. बहुतांश प्रकल्पांतून अवैध पाणी उपसा होत असल्याने उन्हाळ्यातील स्थिती पाहता पाण्याचे नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.जिल्ह्यात ७ मध्यम व ५७ लघु प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्पांत ३६ टक्के जलसाठा तर लघु प्रकल्पांत अवघा ५ टक्के जलसाठा आहे. दोन्ही प्रकल्प मिळून १४ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्क्यांनी हा साठा कमी आहे. गतवर्षी दोन्ही प्रकल्प मिळून १५ टक्के पाणी आहे. सातपैकी १ जोत्याच्या पातळीखाली तर लघु प्रकल्पांपैकी ७ कोरडेठाक तर ३१ प्रकल्पांची पाणी पातळी जोत्याखाली आहे. एकही प्रकल्प ओव्हरफ्लो नाही. मध्यम प्रकल्पांपैकी ० ते २५ टक्के पाणीसाठा असणारे दोन, २६ ते ५० टक्क्यांमध्ये २ तर एका प्रकल्पांत ५१ ते ७५ टक्के जलसाठा आहे. ७६ ते १०० टक्के पाणीसाठा फक्त एका प्रकल्पांत आहे. लघु प्रकल्पांपैकी १३ प्रकल्पांत ० ते २५ टक्के एवढा जलसाठा आहे. ५ प्रकल्पांत २६ ते ५० टक्के जलसाठा आहे. एका प्रकल्पात ७६ ते १०० टक्के पाणी आहे. एकूणच प्रकल्पांतील जलसाठ्याची आकडेवारी पाहता परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे आहेत.ग्रामीण भागात काही ठिकाणी आत्तापासूनच टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. टँकर तसेच विहिरी अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल होत आहे.जलसाठ्यात पाणी नसल्याने विहिरी व कूपनलीकांतील पाणी संपूर्ण उन्हाळा पुरेल अशी चिन्हे नाहीत. भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. (प्रतिनिधी)