शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

‘जलसंधारणा’मुळे फुलले शिवार

By admin | Updated: April 9, 2017 23:37 IST

शिराढोणसतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांची जणू चळवळ उभी राहिली आहे़

राहुल ओमने शिराढोणसतत दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांची जणू चळवळ उभी राहिली आहे़ कळंब तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारातील ढोरी नदीपात्राच्या खोलीकरण-रूंदीकरण कामामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यातही विहिरी, कुपनलिकांना मुबलक पाणी उपलब्ध आहे़ जलयुक्तच्या कामांमुळे या भागातील शिवारही फुलला आहे़मागील चार-पाच वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाई, चारा टंचाईचा न भूतो न भविष्यती प्रश्नही अनुभवास आला़ दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या़ सतत निर्माण होणाऱ्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांनी एकत्रित येऊन लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत़ यात सर्वाधिक कामे ही नदी पात्रातील खोलीकरण- रूंदीकरणाची झाली आहेत़ कळंब तालुक्यातील शिराढोण गावच्या शिवारातील ढोरी नदीपात्रात मागील दोन वर्षात तीन किलोमीटरवर खोलीकरण- रूंदीकरणाचे काम झाले आहे़ गावातील कैलास पाटील, किरण पाटील, सचिन पाटील, हनुमंत सोमासे, रणजित पाटील, राजेश्वर पाटील यांच्यासह इतर शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लोकवाटा जमा करून सुरू केलेले काम आज या गावासाठी उन्हाळ्यातही संजीवनीसारखे ठरत आहे़ या कामासाठी असलेल्या यंत्रणांवर दोन लाख रूपयांचे डिझेल, खोलीकरण-रूंदीकरणातून निघालेली माती शेतात व इतरत्र टाकण्यासाठी ३२ लाख रूपयांचा खर्च लोकवाट्यातून झाला आहे़ तर शासनाकडून १६ लाखाची मदत मिळाली असून, आ़ राणाजगजितसिंह पाटील यांनी आमदार फंडातून दोन लाखाचा निधी या कामासाठी दिला आहे़ या निधीतून गावच्या शिवारातील ढोरी नदीचे ३ किलोमीटरचे खोलीकरण-रूंदीकरणाचे काम करण्यात आले आहे़ या कामाची रूंदी तब्बल ४२ फूट तर खोली १४ फूट आहे़ गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे या खोलीकरण कामात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला होता़ तर सध्याच्या भर उन्हाळ्यातही जलस्त्रोतांना मुबलक प्रमाणात पाणी असून, शिवार हिरवागार दिसत आहे़